शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

८६ तलावांचा ‘पाझर’ थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:22 AM

जिल्ह्यातील ८६ पाझर तलावांची अवस्था बिकट झाली असून, दुरूस्तीअभावी पावसाचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने जलसंधारणाची अनेक कामे हाती घेतली आहेत. मात्र, जिल्ह्यातील ८६ पाझर तलावांची अवस्था बिकट झाली असून, दुरूस्तीअभावी पावसाचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या तलावांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला ७ कोटी ९८ लाखांचा निधी उपलब्ध होत नाही. परिणामी जिल्ह्यातील ८६ तलावांना फुटलेला ‘पाझर’ आजही कायम असून, पावसाचा थेंब-थेंब अडविण्याचे शासनाचे स्वप्न कागदावरच राहत आहे.दुष्काळ जिल्ह्याच्या पाचवीला पुजला असून, टंचाई निवारणार्थ शेकडो टँकर, तात्पुरत्या नळ योजनांसह इतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. घागरभर पाण्यासाठी ग्रामीण भागातील महिला, मुलांसह वयोवृध्दांनाही शेतशिवारात भटकंती करावी लागते. दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक कामेही केली जात आहेत. मात्र, जिल्ह्यातील पाझर तलाव, लघू-मध्यम प्रकल्पांच्या दुरूस्तीकडे मात्र, फासरे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणी, शेतातील जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत वाढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाट बंधारे विभागांतर्गत जिल्ह्यात ५१२ पाझर तलाव बांधण्यात आले आहेत. या तलावाची साठवण क्षमता १ लाख ६१ हजार २४९ द. ल. घ. मी आहे. तर सिंचन क्षमता १३ हजार ४७३ हेक्टर आहे. या तलावांमुळेच जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न मिटू शकतो. परंतु, यातील काही तलावांची दुरुस्ती न झाल्यामुळे या तलावांमध्ये पाणीच राहत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील ८६ पाझर तलाव नादुरुस्त आहेत. जालना तालुक्यातील १५, बदनापूर १०, अंबड ८, घनसावंगी ५, परतूर ७, मंठा १५, भोकरदन १८, जाफराबाद तालुक्यातील ८ तलाव नादुरुस्त आहे. यांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपयांची गरज आहे. यात जालना तालुक्यातील तलावासाठी १ कोटी ५५ लाख, बदनापूर तालुक्यातील तलावासाठी ८० लाख, अंबड तालुक्यातील तलावासाठी ७० लाख, घनसावंगी तालुक्यातील तलावासाठी ४८ लाख, परतूर तालुक्यातील तलावासाठी ५० लाख, मंठा तालुक्यातील तलावासाठी १ कोटी ५० लाख, भोकरदन तालुक्यातील तलावासाठी १ कोटी ७० लाख, जाफराबाद तालुक्यातील ७५ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने या पाझर तलावांची दुरूस्ती होत नाही. परिणामी प्रत्येक वर्षी पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जात आहे. पाझर तलावासह इतर प्रकल्पांच्या दुरूस्तीबाबत अशीच परिस्थिती राहिली तर दुष्काळावर मात होणार कशी ? असाच प्रश्न शेतकरी, सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, याबाबत लघु पाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.साडेतीन कोटींचा खर्च : मागील वर्षी ४७ पाझर तलावांची दुरुस्तीजलयुक्त शिवार योजनेतंर्गत सन २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने ४७ पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती लघु पाट बंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. यात जालना तालुक्यातील ६, बदनापूर ७, परतूर २, मंठा १२, भोकरदन १३, जाफराबाद तालुक्यातील ७ तलावांची दुरुस्ती करण्यात आली आहे. यासाठी ३ कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी