शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

१८,३९२ खात्यात ८५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 12:28 AM

१८ हजार ३९२ कर्जखात्यांमध्ये तब्बल ८४ कोटी ९९ लाख ८५ हजार ६१४ रूपये वर्ग करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार ४५५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर १८ हजार ३९२ कर्जखात्यांमध्ये तब्बल ८४ कोटी ९९ लाख ८५ हजार ६१४ रूपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित खातेधारक शेतक-याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी झाला आहे.महाआघाडी शासनाने कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर प्रारंभी दोन लाख रूपयाच्या आत कर्ज असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँकेतील कर्ज खात्याशी संलग्न करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने राबविली. त्यानंतर शासकीय वेबसाईटवर १ लाख ८१ हजार ५६७ शेतक-यांची नावे अपलोड करण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी प्राथमिक टप्प्यात शासनाकडून यादी जाहीर करण्यात आली. यात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ शेतक-यांचा समावेश होता. आलेल्या २९ फेब्रुवारी रोजी आलेल्या दुस-या यादीत जिल्ह्यातील ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.शासनाने जाहीर केलेल्या दोन्ही याद्यांमधील १ लाख ३० हजार १५८ शेतक-यांपैकी ८३ हजार ६४८ शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करून कर्जमाफीला मान्यता दिली आहे. तसेच आजवर १८ हजार ३९२ कर्जखात्यावर ४४ कोटी ९९ लाख ८५ हजार ६१४ रूपये शासनाकडून वर्ग करण्यात आले आहेत. यात राष्ट्रीयकृत बँकेच्या ६९४० खात्यावर ५७ कोटी २७ लाख ४६ हजार ९५६ रूपये तर जिल्हा बँकेतील ११ हजार ४५२ कर्ज खात्यावर २७ कोटी ७२ लाख ३८ हजार ६५८ रूपये वर्ग झाले आहेत.दरम्यान, आधार प्रमाणिकरण वेळेत व्हावे, लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्यासह सर्वच संबंधित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.शेतक-याने वाटले पेढे : भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक शेतकरीकर्जमुक्ती यादीत नाव आल्यानंतर परतूर तालुक्यातील दैठणा (बु.) येथील शेतकरी अंकुश केशव गायके यांनी आधार प्रमाणीकरण केले. त्यानंतर त्यांनी उपस्थित शेतक-यांसह नागरिकांना पेढे वाटून कर्जमुक्तीचा आनंद साजरा करून महाआघाडी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र