शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सहा सिंचन प्रकल्पांसाठी मिळणार ७७५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:52 IST

पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत जालना जिल्ह्यातील सहा लघू प्रकल्पांना मंजुरी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यांमध्ये ४८.६८ टक्के एवढी वाढ होणार असून, या पाण्याच्या माध्यमातून जवळपास ५ हजार २८४ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत जालना जिल्ह्यातील सहा लघू प्रकल्पांना मंजुरी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यांमध्ये ४८.६८ टक्के एवढी वाढ होणार असून, या पाण्याच्या माध्यमातून जवळपास ५ हजार २८४ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.दोन महिन्यापूर्वी लघू पाटबंधारे विभागाच्या येथील विभागाने पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत हे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविले होते. या संदर्भात नुकतीच दिल्ली येथे बैठक होऊन विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागातील ८३ लघू सिंचन प्रकल्प पूर्ण करण्या संदर्भात केंद्र सरकारचे अर्थसाह्य मिळणार आहे. केंद्र सरकारतर्फे आर्थिक मदत देण्यासाठी केंद्रीय जलसंपदा, नदीविकास योजनेतून या प्रकल्पांना निधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास १४ जिल्ह्यांना याचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.भोकरदन तालुक्यातील पळसखेडा प्रकल्पासाठी १७२८.८६ लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. यातून ७.८३ द.ल.घ.मि. एवढे पाणी या प्रकल्पामध्ये साठविता येणार असून, त्यातून ५७० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. मंठा तालुक्यातील पाटोदा येथील प्रकल्पासाठी ८४.७५ लाख रुपये मिळणार असून, यातून ८.६०७ द.ल.घ.मी. साठवण क्षमता निर्माण होणार असून, जवळपास ११०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. खोराड सावंगी या प्रकल्पासाठी १५१८.२१ लाख रुपये मिळणार असून, यातून २.५५ द.ल.घ.मी. पाणासाठा निर्माण होईल.या पाणीसाठ्याच्या माध्यमातून २५४ हेक्टर जमिनी ओलिताखाली येणार आहे. जालना तालुक्यातील हातवन लघू प्रकल्प पूर्णत्वासाठी ३७३१७.१७ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, यामध्ये १५.०३ द.ल.घी. साठवण क्षमता निर्माण होईल. या माध्यमातून परिसरातील जवळपास १६७५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. जाफराबाद तालुक्यातील बरबडा प्रकल्पासाठी १९७७६.८५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, या माध्यमातून ११.६ द.ल.घ.मी. पाणी साठणार आहे. यातून १२२५ हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. जाफराबाद तालुक्यातील सोमखेडा येथील प्रकल्पासाठी ३८४९ कोटी रुपये अपेक्षित असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ३.६२ द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण होईल, त्यातून ४४५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. आता ही कामे किती लवकर सुरू होतात, याकडे लक्ष आहे.सध्या जालना जिल्हा हे राजकीय दृष्ट्या महत्वाचे केंद्र बनले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे असून,बबनराव लोणीकरांच्या रूपाने एक कॅबिनेट मंत्री तर अर्जुन खोतकऱ्यांच्या रूपाने एक राज्यमंत्री अशी सत्ता केंद्र असल्याने या प्रकल्पांना गती मिळेल.

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजना