शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

‘सुपर ३०’ साठी ५३४ विद्यार्थ्यांची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:11 AM

खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपले आयआयटीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : गुणवत्ता असतानाही होतकरू विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे, यासाठी खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपले आयआयटीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठीच्या प्रवेशाची १८ शनिवारी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. ५३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.ग्रामीण भागातील गुणवंत हुशार विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणाकडे जात नाही. परिणामी, गुणवंत गुणवत्ता असतांनाही उच्च शिक्षणापासून ही मुले वंचित राहतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आयआयटीचे शिक्षण घेता यावे, यासाठी खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीने आयआयटी सुपर थर्टी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कृषिभूषण विजयअण्णा बोराडे, कृषिभूषण भगवानराव काळे यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, यासाठी ज्या गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घ्याचा आहे. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तब्बल साडेसातशे विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले.त्यानुसार १८ मे रोजी प्रवेशपूर्व परिक्षा घेण्यात आली. ५३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, त्याचे निकालही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी स्वत: विद्यार्थ्यांचे ओळखपत्र व बैठक व्यवस्थेची पाहणी केली.३० विद्यार्थ्यांना मिळणार संधीयातून तीस विद्यार्थींची निवड करण्यात येणार असून, त्यांची अकरावी व बारावीची सर्व तयारी मोफत केली जाणार आहे. ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना ही मोठी संधी मिळाली आहे.ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, शिक्षक विचारवंत तसेच कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.४जालना जिल्ह्यात आयआयटीची तयारी करण्यासाठी क्लासेस नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यातच बाहेर गावी शिक्षणांसाठी लाखो रुपये खर्च येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा असतांनाही त्यांना आयआयटीत प्रवेश घेता येत नाही.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीexamपरीक्षाtechnologyतंत्रज्ञान