शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

१३६५ शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:01 IST

जिल्ह्यातील ८५ सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील १३६५ शेतक-यांना दिलेले १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या सावकारकी कर्जमाफी योजनेतून सावकाराच्या परवाना कार्यक्षेत्राच्या बाहेरील शेतकरी वंचित राहिले होते. मात्र, नुकताच शासनाने कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज देणा-या सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८५ सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील १३६५ शेतक-यांना दिलेले १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.सततच्या दुष्काळामुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप, रबी हंगाम शेतक-यांच्या हातून जात असून, केलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, शेती मशागत यासह इतर कामांसाठी शेतकरी कर्ज मिळावे म्हणून बँकेच्या पाय-या झिजवितात. बँका कर्ज देत नसल्याने अनेकांना सावकारांकडून कर्ज घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. सावकार कर्ज देत असले तरी भरमसाठ व्याज लावून शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करतात. शेतक-यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने नियम-अटी घालून अनेकांना सावकारकी करण्याची परवानगी दिली. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने शासनाने २०१५ मध्ये सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील ४० सावकारांनी १२४३ शेतक-यांना दिलेले १ कोटी ३७ लाख रूपयांचे कर्ज माफ झाले होते.मात्र, शासनाच्या या कर्जमाफी योजनेत परवाना कार्यक्षेत्राच्या बाहेरील ज्या शेतकºयांना कर्जाचे वाटप झाले ते कर्ज माफ करण्यात आले नव्हते. हे कर्जही माफ व्हावे, यासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात आली. न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यंदाही पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील शेतक-यांना वाटप केलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात जालना जिल्ह्यातील ७६ सावकारांनी तालुका कार्यक्षेत्राबाहेरील १३२३ शेतक-यांना १ कोटी ४६ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर ९ सावकारांनी जिल्ह्याच्या बाहेरील ४२ शेतक-यांना ४ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. असे एकूण १३६५ शेतक-यांचे ८५ सावकारांकडील १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. शासन निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे.जालना जिल्ह्यात सद्यस्थितीत ११० परवानाधारक सावकार आहेत. यात जालना तालुक्यात ७०, बदनापूर ८, अंबड ३, घनसावंगी ९, परतूर ८, मंठा ४, जाफराबाद ६ तर भोकरदन तालुक्यात २ परवानाधारक सावकार असल्याची नोंद जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आहे.परवाना नूतनीकरण करण्यासाठीही सावकारांची उपनिबंधक कार्यालयात सतत वर्दळ असते. तर काही जण नवीन प्रस्तावही दाखल करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाRegistrarकुलसचिवgovernment schemeसरकारी योजना