शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

१३६५ शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:01 IST

जिल्ह्यातील ८५ सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील १३६५ शेतक-यांना दिलेले १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या सावकारकी कर्जमाफी योजनेतून सावकाराच्या परवाना कार्यक्षेत्राच्या बाहेरील शेतकरी वंचित राहिले होते. मात्र, नुकताच शासनाने कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज देणा-या सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८५ सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील १३६५ शेतक-यांना दिलेले १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.सततच्या दुष्काळामुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप, रबी हंगाम शेतक-यांच्या हातून जात असून, केलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, शेती मशागत यासह इतर कामांसाठी शेतकरी कर्ज मिळावे म्हणून बँकेच्या पाय-या झिजवितात. बँका कर्ज देत नसल्याने अनेकांना सावकारांकडून कर्ज घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. सावकार कर्ज देत असले तरी भरमसाठ व्याज लावून शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करतात. शेतक-यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने नियम-अटी घालून अनेकांना सावकारकी करण्याची परवानगी दिली. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने शासनाने २०१५ मध्ये सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील ४० सावकारांनी १२४३ शेतक-यांना दिलेले १ कोटी ३७ लाख रूपयांचे कर्ज माफ झाले होते.मात्र, शासनाच्या या कर्जमाफी योजनेत परवाना कार्यक्षेत्राच्या बाहेरील ज्या शेतकºयांना कर्जाचे वाटप झाले ते कर्ज माफ करण्यात आले नव्हते. हे कर्जही माफ व्हावे, यासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात आली. न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यंदाही पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील शेतक-यांना वाटप केलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात जालना जिल्ह्यातील ७६ सावकारांनी तालुका कार्यक्षेत्राबाहेरील १३२३ शेतक-यांना १ कोटी ४६ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर ९ सावकारांनी जिल्ह्याच्या बाहेरील ४२ शेतक-यांना ४ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. असे एकूण १३६५ शेतक-यांचे ८५ सावकारांकडील १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. शासन निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे.जालना जिल्ह्यात सद्यस्थितीत ११० परवानाधारक सावकार आहेत. यात जालना तालुक्यात ७०, बदनापूर ८, अंबड ३, घनसावंगी ९, परतूर ८, मंठा ४, जाफराबाद ६ तर भोकरदन तालुक्यात २ परवानाधारक सावकार असल्याची नोंद जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आहे.परवाना नूतनीकरण करण्यासाठीही सावकारांची उपनिबंधक कार्यालयात सतत वर्दळ असते. तर काही जण नवीन प्रस्तावही दाखल करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाRegistrarकुलसचिवgovernment schemeसरकारी योजना