शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

१३६५ शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:01 IST

जिल्ह्यातील ८५ सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील १३६५ शेतक-यांना दिलेले १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या सावकारकी कर्जमाफी योजनेतून सावकाराच्या परवाना कार्यक्षेत्राच्या बाहेरील शेतकरी वंचित राहिले होते. मात्र, नुकताच शासनाने कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज देणा-या सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८५ सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील १३६५ शेतक-यांना दिलेले १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.सततच्या दुष्काळामुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप, रबी हंगाम शेतक-यांच्या हातून जात असून, केलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, शेती मशागत यासह इतर कामांसाठी शेतकरी कर्ज मिळावे म्हणून बँकेच्या पाय-या झिजवितात. बँका कर्ज देत नसल्याने अनेकांना सावकारांकडून कर्ज घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. सावकार कर्ज देत असले तरी भरमसाठ व्याज लावून शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करतात. शेतक-यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने नियम-अटी घालून अनेकांना सावकारकी करण्याची परवानगी दिली. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने शासनाने २०१५ मध्ये सावकारांकडील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील ४० सावकारांनी १२४३ शेतक-यांना दिलेले १ कोटी ३७ लाख रूपयांचे कर्ज माफ झाले होते.मात्र, शासनाच्या या कर्जमाफी योजनेत परवाना कार्यक्षेत्राच्या बाहेरील ज्या शेतकºयांना कर्जाचे वाटप झाले ते कर्ज माफ करण्यात आले नव्हते. हे कर्जही माफ व्हावे, यासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात आली. न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यंदाही पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील शेतक-यांना वाटप केलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात जालना जिल्ह्यातील ७६ सावकारांनी तालुका कार्यक्षेत्राबाहेरील १३२३ शेतक-यांना १ कोटी ४६ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर ९ सावकारांनी जिल्ह्याच्या बाहेरील ४२ शेतक-यांना ४ लाख ३७ हजार रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. असे एकूण १३६५ शेतक-यांचे ८५ सावकारांकडील १ कोटी ५० लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. शासन निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे.जालना जिल्ह्यात सद्यस्थितीत ११० परवानाधारक सावकार आहेत. यात जालना तालुक्यात ७०, बदनापूर ८, अंबड ३, घनसावंगी ९, परतूर ८, मंठा ४, जाफराबाद ६ तर भोकरदन तालुक्यात २ परवानाधारक सावकार असल्याची नोंद जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आहे.परवाना नूतनीकरण करण्यासाठीही सावकारांची उपनिबंधक कार्यालयात सतत वर्दळ असते. तर काही जण नवीन प्रस्तावही दाखल करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाRegistrarकुलसचिवgovernment schemeसरकारी योजना