शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

१२६ शेतकरी सावकारकीतून मुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 1:28 AM

कर्जमाफी देण्याच्या शासन निर्णयानुसार आता १२६ शेतकरी पात्र ठरले आहेत. संबंधितांचे २९ लाख रूपये कर्जमाफ होणार आहे.

विजय मुंडे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या २०१४ मधील सावकारकी कर्जमाफी योजनेत परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेले कार्यक्षेत्राबाहेरील शेतकरी वंचित राहिले होते. या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याच्या शासन निर्णयानुसार आता १२६ शेतकरी पात्र ठरले आहेत. संबंधितांचे २९ लाख रूपये कर्जमाफ होणार आहे.राज्य शासनाने नोव्हेंबर २०१४ मध्ये परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील ४० सावकारांकडून कर्ज घेतलेल्या १२४३ शेतक-यांचे १ कोटी ३७ लाख रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले होते. मात्र, या कर्जमाफी योजनेत सावकारांच्या मर्यादित कार्यक्षेत्राबाहेरील कर्जदार शेतकरी वंचित राहिले होते. या शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागाणी सतत होत होती. यात जिल्ह्यातील २७ सावकारांकडून कर्ज घेतलेल्या १३३३ शेतक-यांचा समावेश होता. या शेतक-यांचे जवळपास १ कोटी ४९ लाख २६ हजार रूपये कर्ज थकीत होते. शेतक-यांमधून होणारी मागणी पाहता शासनाने सप्टेंबर २०१९ मध्ये पारवानधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतक-यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता.शासनाच्या निर्णयानंतर जिल्हा व तालुकास्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आली होती...तरच सावकारांना मिळणार रक्कमशासनाच्या सावकारकी कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या शेतक-यांनी गहाण ठेवलेल्या जमीन, वस्तू सावकारांनी परत केल्याची खातरजमा प्रशासनाकडून केली जाणार आहे.शेतक-यांच्या वस्तू, जमिनी परत मिळाल्याची खातरजमा झाल्यानंतरच सावकारांना शेतकरी कर्जमाफीची रक्कम दिली जाणार आहे.एक हजार शेतक-यांनी फेडले कर्जशासनाच्या सावकारकी कर्जमाफी योजनेत अपात्र झाल्यानंतर कार्यक्षेत्राबाहेरील तब्बल एक हजारावर शेतक-यांनी सावकाराकडील कर्जाची परतफेड केली. त्यानंतर शासनाने कार्यक्षेत्राबाहेरील शेतक-यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या शेतक-यांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळाला नाही.१११ शेतक-यांबाबत वरिष्ठांकडे मागविले मार्गदर्शनशासनाच्या या सावकारकी कर्जमाफी योजनेत विविध कारणास्तव १११ शेतकरी अपात्र ठरत आहेत. त्यामुळे या शेतक-यांचा अहवाल वरिष्ठ अधिका-यांकडे पाठवून कर्जमाफीबाबत मार्गदर्शन मागविले आहे. वरिष्ठांचा अहवाल आल्यानंतरच या शेतक-यांच्या कर्जमाफी पात्रतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी