शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

२८६ कोटींचा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:19 AM

जालना जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून फेब्रवारीत झालेल्या वित्त मंत्र्यांच्या बैठकीत या आराखड्यात ३६ कोटी १० लाख रूपयांची वाढ करून घेतल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

ठळक मुद्देजालना जिल्हा नियोजन समिती बैठक : पालकमंत्री लोणीकर यांची माहिती, दुष्काळ, विम्याचा मुद्दा गाजला

जालना : जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आगामी वर्षासाठीच्या जवळपास २८६ कोटी रूपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जालना जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून फेब्रवारीत झालेल्या वित्त मंत्र्यांच्या बैठकीत या आराखड्यात ३६ कोटी १० लाख रूपयांची वाढ करून घेतल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जालना जिल्ह्यातील दुष्काळाचा मुद्दाही चांगलाच गाजला. उपस्थित सदस्यांनी दुष्काळाबाबत प्रशासन हलत नसल्याच्या तक्रारी केल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आली. पाणीटंचाई वीजेचा प्रश्न, पीकविमा आणि अन्य विकास कामांच्या मुद्यावरून उपस्थित सदस्यांनी आपले मुद्दे समिती समोर मांडले. याला संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली, मात्र, त्या उत्तरांवर पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नसल्याचे दिसून आले.एकूणच प्रशासनाने कारभार सुधारावा अशा स्पष्ट सूचना केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्या.यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील जिल्ह्यातील दुष्काळावर आक्रमक भूमिका मांडली. आ. राजेश टोपे यांनी वीजेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगून वादळी वाºयांमुळे जे विद्युत खांब कोसळे आहेत, ते पुन्हा उभे करताना आठ-आठ दिवस लागत असल्याने अनेक गावे अंधारात असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. पिकविम्याचा मुद्दाही त्यांनी प्रभावीपणे मांडला.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी जिल्हा परिषदेसाठी जो निधी दिला जातो, तो देतांना तांत्रिक अडचणी सांगून तो इतरत्र कसा वळवला असा सवाल करून प्रशासनाला धारेवर धरले. एकूणच विविध विकास कामांच्या मुद्यावरून ही बैठक वादळी ठरली.बैठकीस नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, सुनीता दौंड, दमयंती सावंत, उषा तोडावत, प्रतिभा बंड, कुशीवर्ता जाधव, सुरेखा लहाने, वैजयंती प्रधान, मनिषा जंजाळ, प्रतिभा घनवट, अनिता राठोड, लिलाबाई लोखंडे, अंशीराम कंटुळे, कैलास चव्हाण, चंद्रकांत साबळे, सोपान पाडमुख, यादवराव राऊत, गणेश पवार, गणेश फुके, संतोष अन्नदाते, आमेरखान एकबालखान आदींची उपस्थिती होती. यावेळी सदस्यांनीही त्यांच्या भागातील प्रश्न बैठकीत मांडले.

टॅग्स :JalanaजालनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकरdroughtदुष्काळ