शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

संचारबंदीच्या काळात 25 हजार पॉझिटिव्ह; 15 दिवसांनंतरही रुग्ण कमी होईनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:49 AM

जिल्ह्यात फेब्रवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आणखी वेगाने पसरली. ज्यावेळी ग्रामीणमध्ये कमी रुग्ण होते, त्यावेळी जालना शहर हे कोरोनाचे ...

जिल्ह्यात फेब्रवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आणखी वेगाने पसरली. ज्यावेळी ग्रामीणमध्ये कमी रुग्ण होते, त्यावेळी जालना शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते; परंतु आता जालन्यासह ग्रामीण भागातही कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरले आहेत. शहरातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या वाढताच कोरोनाचा आलेख वाढला आहे. मध्यंतरी कोरोनाच्या चाचण्या वाढल्या असून, त्याचाही परिणाम रुग्ण वाढीवर झाला, परंतु चाचण्या वाढल्याने बरेच छुपे रुग्ण समोर आल्याने कोरोनाचा पाहिजे तेवढा फैलाव रोखण्यास मदत झाली आहे. आज हे रुग्ण निदान उपचार करत असून, यामुळे स्प्रेड होण्याचे प्रमाण काही अंशी का होईना कमी झाले आहे. एकीकडे संचारबंदी असताना दुसरीकडे शेती, बँक तसेच अन्य वित्तीय संस्था सुरूच आहेत. कुठलेही कारण पुढे करून नागरिक घराबाहेर पडत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. हे निर्बंध आणखी कडक झाल्यास परिणाम होऊ शकतो.

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

गर्दी न करणे तसेच सुरक्षित अंतर न पाळल्याने जालन्यात कोरोनाची वाढ कायम आहे. वारंवार सांगूही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

प्रवासावर असलेली बंदी ही कुचकामी ठरत आहे. अनेक जण मुंबई, पुणे अशा महानगरांमधून ग्रामीण भागात येत आहेत. त्यांची चाचणी होत नसल्याने फैलाव वाढला आहे.

शहरी भागात लसीकरण करण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येत आहेत. असे असतानाच ग्रामीण भागात मात्र, लसीकरणासाठी ग्रामस्थांना विनवण्या करण्याची वेळ आली आहे. गैरसमजातून ग्रामीणमध्ये लसीकरणाचा वेग पाहिजे तेवढा नसल्याने स्थिती बिघडत आहे.

ग्रामीण भागांत रुग्ण वाढले, कारण?

ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे कारण म्हणजेच मास्क न वापरणे, सॅनिटायझरला नाकारण्यासह कोरोना हा आजारच नाही, असा गैरसमज करून घेण्याचे प्रमाण जास्त आहे.

अनेक जण ताप, थंडी, सर्दी असल्यानंतरही त्यासाठी दवाखान्यात न जाता तो आजार अंगावरच काढला जात आहे. तसेच चाचणीसाठी स्वॅब घेताना जो प्लास्टिकचा चमचा नाक आणि घशात घालून स्वॅब घेतला जातो त्यांचीही भीती आहे.