शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

२३५ कोटींचा निधी मिळूनही विकासकामे खोळंबणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

जिल्ह्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे मोठे योगदान आणि महत्त्व आहे. कोरोनामुळे नुकत्याच संपलेल्या २०२० सालात नियोजन विभागाची ...

जिल्ह्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे मोठे योगदान आणि महत्त्व आहे. कोरोनामुळे नुकत्याच संपलेल्या २०२० सालात नियोजन विभागाची एकही बैठक झाली नाही. गेल्यावर्षीच्या प्रारंभी झालेल्या बैठकीत जालना जिल्ह्याचा वार्षिक आराखडा हा जवळपास २३५ कोटी रुपयांचा मंजूर केला होता. परंतु, नंतर या आराखड्याचा पाठपुरावा करण्यासाठी कोरोनामुळे प्रशासन आणि राजकीय नेत्यांना वेळ मिळाला नाही. त्यातच कोरोनामुळे राज्याची तिजोरीही रिकामी झाली होती. आता राज्याच्या तिजोरीत वेगवेगळ्या मार्गाने मोठ्या प्रमाणात महसूल येत असल्याने हळूहळू वेगवेगळ्या विभागांना लागणारा निधी वितरीत केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून जालना जिल्हा नियोजन विभागालाही २३५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. परंतु, आता हा निधी मिळूनही त्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे विविध विभागांचे प्रस्ताव मागविणे आणि त्यानंतर त्या कामांच्या निविदा काढून ही कामे सुरू करण्यास वेळ खूप कमी आहे. या निधीचा विनयोग हा ३१ मार्चपर्यंत करणे अपेक्षित असते. परंतु, या दोन महिन्यांत हा निधी कसा खर्च होणार, असा प्रश्न यंत्रणांसमोर निर्माण झाला आहे. हा निधी उशिरा मिळाला असला तरी काही कामे तातडीने पूर्ण करून जास्तीत-जास्त निधी विकासकामांवर खर्च करता येईल, याबाबतचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहेत. एकूणच कोरोनामुळे ज्या पध्दतीने उद्योग व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे आता जिल्ह्यातील रस्ते, दुरुस्ती आणि वेगवेगळ्या योजनांवर परिणाम होणार आहे.

शासनाकडून भेदभाव नाही

कोरोनाकाळात निधीला कात्री लागेल अशी अपेक्षा होती. परंतु, राज्य सरकारने यामध्ये कुठलाच भेदभाव न करता जिल्हा नियोजन समितीने संमत केलेल्या आराखड्यानुसार निधी मिळाला आहे. त्यामुळे तो आता खर्च होणे गरजेचे आहे.

राज्य सरकार निधी देताना तो त्याच कामांवर खर्च व्हावा, या अपेक्षेने देते. कोरोनाकाळातही सरकारने नियोजन समितीला ठरलेला निधी वितरीत केल्याने सरकारचे एक प्रकारचे आभारच मानले पाहिजेत. या मताचे आपण आहोत.

- कैलास गोरंट्याल, सत्ताधारी आमदार

राज्य सरकारने निधी वितरीत करताना तो केवळ कागदोपत्री केल्याचे दिसून येते. उशिरा निधी मिळाल्याने यातून आता दरवर्षीप्रमाणे विकासकामे होणार नाहीत. त्यामुळे हा एक केवळ दिखाऊपणाच म्हणावा लागेल.

- संतोष दानवे, विराेधी आमदार