शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात २१५ कच्च्या घरांची पडझड, एकाचा वाहून गेल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 18:05 IST

१५ ऑगस्टनंतर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पंधरा दिवसात जवळपास २०० मिलीमीटर एवढा पाऊस झाला.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात जोरदार पाऊस वार्षिक सरासरी ओलांडली

जालना : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, जवळपास ८५२.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, याची टक्केवारी ही १४१ एवढी होत आहे. हा पाऊस सर्वात जास्त अंबड आणि घनसावंगीत पडला. यामुळे जिल्ह्यातील जवळपास २१५ कच्ची घरे पडली असल्याचे सांगण्यात आले. तर, अंदाजे जवळपास १८ हजार ३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मध्यंतरी पाऊस रूसल्याने खरिपाची पिके घोक्यात येण्याची भीती व्यक्त होत होती. असे असतानाच १५ ऑगस्टनंतर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पंधरा दिवसात जवळपास २०० मिलीमीटर एवढा पाऊस झाला. या जोरदार पावसाने जिल्ह्याची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. आठ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ८५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसाने परतूर तालुक्यातील बामणी गावातील रहिवासी आसाराम बाबूराव खालापुरे वय ५० हे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

या जोरदार पावसाचा सर्वात मोठा फटका अंबड आणि घनसावंगी तालुक्याला बसला. या दोन तालुक्यांमध्ये २२२ कोंबड्यांचा मृत्यू झाला असून, १३८ मोठी जनावारे वाहून गेली. त्यात गाय, म्हैस, बैल, बकऱ्यांचा समावेश आहे. नजर पंचनाम्यानुसार एकट्या अंबड तालुक्यात जवळपास साडेचार हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, घनसावंगी तालुक्यातही तीन हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहेत. परतूर तालुक्यातील आष्टी व परिसरातही जोरदार पावसाने आजही अनेकांच्या शेतात मोठे पाणी साचले आहे.

हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

प्रकल्पांमध्ये ६७ टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ६१ टक्के पाणीसाठा असून, जवळपास ५७ लघु तलावांमध्ये ६८ टक्के पाणी साठले आहे. अंबड तालुक्यातील गल्हाटी हा मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून, जिल्ह्यातील २६ लघु तलावही शंभर टक्के भरले असून, अन्य तलावांमध्ये देखील ८० टक्के पाणीसाठा साचला आहे. जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्पांत ५१ टक्के, कल्याण गिरीजा शंभर टक्के, बदनापूर तालुक्यातील अपर दुधनामध्ये २८ टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात ५४ .७३ टक्के, धामना ४३ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्प अद्यापही कोरडा असून, तेथे केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ५७ लघु प्रकल्प असून, त्यात मंगळवार पर्यंत ६७ .६५ टक्के पाणी साठले आहे. यातील सहा लघु तलावांमध्ये दमदार पावसानंतरही ते प्रकल्प जोत्याच्या पाणी पातळीखाली असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊस