शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात २१५ कच्च्या घरांची पडझड, एकाचा वाहून गेल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 18:05 IST

१५ ऑगस्टनंतर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पंधरा दिवसात जवळपास २०० मिलीमीटर एवढा पाऊस झाला.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात जोरदार पाऊस वार्षिक सरासरी ओलांडली

जालना : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, जवळपास ८५२.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, याची टक्केवारी ही १४१ एवढी होत आहे. हा पाऊस सर्वात जास्त अंबड आणि घनसावंगीत पडला. यामुळे जिल्ह्यातील जवळपास २१५ कच्ची घरे पडली असल्याचे सांगण्यात आले. तर, अंदाजे जवळपास १८ हजार ३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मध्यंतरी पाऊस रूसल्याने खरिपाची पिके घोक्यात येण्याची भीती व्यक्त होत होती. असे असतानाच १५ ऑगस्टनंतर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पंधरा दिवसात जवळपास २०० मिलीमीटर एवढा पाऊस झाला. या जोरदार पावसाने जिल्ह्याची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. आठ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ८५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसाने परतूर तालुक्यातील बामणी गावातील रहिवासी आसाराम बाबूराव खालापुरे वय ५० हे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

या जोरदार पावसाचा सर्वात मोठा फटका अंबड आणि घनसावंगी तालुक्याला बसला. या दोन तालुक्यांमध्ये २२२ कोंबड्यांचा मृत्यू झाला असून, १३८ मोठी जनावारे वाहून गेली. त्यात गाय, म्हैस, बैल, बकऱ्यांचा समावेश आहे. नजर पंचनाम्यानुसार एकट्या अंबड तालुक्यात जवळपास साडेचार हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, घनसावंगी तालुक्यातही तीन हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहेत. परतूर तालुक्यातील आष्टी व परिसरातही जोरदार पावसाने आजही अनेकांच्या शेतात मोठे पाणी साचले आहे.

हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

प्रकल्पांमध्ये ६७ टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ६१ टक्के पाणीसाठा असून, जवळपास ५७ लघु तलावांमध्ये ६८ टक्के पाणी साठले आहे. अंबड तालुक्यातील गल्हाटी हा मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून, जिल्ह्यातील २६ लघु तलावही शंभर टक्के भरले असून, अन्य तलावांमध्ये देखील ८० टक्के पाणीसाठा साचला आहे. जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्पांत ५१ टक्के, कल्याण गिरीजा शंभर टक्के, बदनापूर तालुक्यातील अपर दुधनामध्ये २८ टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात ५४ .७३ टक्के, धामना ४३ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्प अद्यापही कोरडा असून, तेथे केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ५७ लघु प्रकल्प असून, त्यात मंगळवार पर्यंत ६७ .६५ टक्के पाणी साठले आहे. यातील सहा लघु तलावांमध्ये दमदार पावसानंतरही ते प्रकल्प जोत्याच्या पाणी पातळीखाली असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊस