शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

१२५ कोटी राज्य सरकारकडे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:05 IST

जवळपास १२५ कोटी राज्य सरकारकडे अडकले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढीसाठी पाझर तलाव, साठवण तलाव आणि मध्यम प्रकल्पांसाठी गेल्या वीस वर्षापूर्वीपासून शासनाच्या पाटबंधारे तसेच रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांची जमीन संपादीत केली आहे. असे असले तरी अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांना न्यायालच्या आदेशानंतर वाढीव मावेजा मिळण्यास अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी आणि शासनातील अधिकारी वैतागले आहेत. जवळपास १२५ कोटी राज्य सरकारकडे अडकले आहेत. हे तर केवळ या दोन विभागांचेच आहेत. अन्य कारणांसाठी संपादीत जमिनीच्या रकमेचा विचार केल्यास ती रक्कम थेट चारशे कोटी रूपयांच्या घरात जाते.जालना जिल्हा हा सिंचनाच्या अनुशेषात मोठ्या प्रमाणावर अन्य जिल्ह्यातील तुलनेने खूप मागे आहे. हा अनुशेष दूर करण्यासाठी मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले गेले होते. यातही अनेक प्रकरणांमध्ये संपादीत जमीन आजही त्याच शेतक-यांच्या नावावर असून, काही प्रकल्पांची कामे ही कागदोपत्री करण्यात आल्याच्या तक्रारी पंचायतराज समितीकडे करण्यात आल्या होत्या.पूर्वी ही कामे जलसंधारण विभाग स्थानिक स्तरकडून केली जात होती. त्यात रोजगार हमी योजनेतून याची कोट्यवधी रूपयांची देयके अदा केली होती.हे कमी की, काय म्हणून ज्या जमिनीवर प्रत्यक्षात सिंचन प्रकल्प उभारले आहेत, त्याच्या भूसंपादनाची रक्कमही अद्याप अनेकांना मिळालेली नाही. याचा मोठा फटका शासन आणि शेतक-यांना बसत आहे. अनेकांनी त्यांना शासनाने दिलेला मावेजा मान्य नसल्याने शेतकरी न्यायालयात गेले होते. न्यायालयाने वाढीव मावेजा मंजूर करुन तो शेतक-यांना तातडीने द्यावा असे निर्देशही दिले आहेत. परंतू त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी अ‍ॅड. संजय काळबांडे यांनी नुकतीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर विषयी लक्ष घालण्याची मागणी करुन निवेदन दिले आहे.भूसंपादनाचे पैसे वेळेत न दिल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक शासकीय अधिकाºयांच्या खुर्च्या तसेच अन्य साहित्य जप्त करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावते तसेच मंजूर मावेजाच्या रकमेवर १५ टक्के व्याजदार द्यावा लागत आहे.त्यामुळे मावेजाची रक्कम ही दिवसेंदिवस वाढून याचा मोठा फटका शासनालाच बसणार आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी अभ्यास समिती नेमून त्यांचा अहवाल मागवावा आणि भूसंपादनाची रक्कम तातडीने शेतक-यांना कशी देता येईल याबद्दलचा विचारही करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजना