शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 1:21 AM

जिल्हाभरातील २ लाख ३७ हजार शेतक-यांनी २ हजार ४०९ कोटी रूपयांचे कर्ज घेतलेले आहे. त्यापैकी दीड लाख शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले सन्मान कर्जमाफी योजनेनुसार दोन लाख रूपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याचे जाहीर केले होते, तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील २ लाख ३७ हजार शेतक-यांनी २ हजार ४०९ कोटी रूपयांचे कर्ज घेतलेले आहे. त्यापैकी दीड लाख शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. त्यामध्ये दीड लाखापर्यंतच्या कर्जाला सशर्त सक्ती दिली होती. त्यामध्ये अल्पमुदत पीककर्ज व मध्यम मुदतीच्या कर्जाला माफी मिळाली होती. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात दोन लाखांच्या वरती कर्ज असलेल्या शेतकºयांचे कर्जमाफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या शेतक-यांनाही कर्जमाफीची प्रतीक्षा लागून आहे.जिल्हाभरात २ लाख ३७ हजार शेतक-यांनी २ हजार ४०९ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले आहे. यातील जवळपास दीड लाख शेतक-यांचे कर्ज हे २ लाखाच्या आत असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे दीड लाख शेतक-यांना महात्मा जोतीराव फुले सन्मान कर्जमाफी योजनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.दरवर्षी खरीप आणि रबी हंगामात बियाणे, खत, पेरणी, शेतीची मशागत करण्यासाठी अर्थिक मदत म्हणून शेतक-यांना पीक कर्जाचा आधार असतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पीककर्ज घेण्याचे प्रमाणही वाढत आहे. पीककर्ज न फेडल्यामुळे तेचे व्याजही वाढत आहे.आढावा : याद्या तयार करण्याचे काम सुरूशेतकरी लागवडीसाठी दरवर्षी विविध बँकांकडून कर्ज घेतात. या पीककर्जातून शेतकरी पिकांवर औषध फवारणी, खत टाकणे इ. कामे करतात. २०१६-१७ यावर्षात जिल्हाभरातील १ लाख ८८ हजार १५२ शेतक-यांना १ हजार ४०० कोटींचे कर्ज देण्यात आले होते.२०१७-१८ मध्ये १ लाख २३ हजार ६३८ शेतक-यांना ४१३ कोटींचे पीककर्जाचे वाटप करण्यात आले. २०१८-१९ मध्ये १ लाख ६२ हजार ३७५ शेतक-यांना १ हजार ९६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने सांगण्यात आले.अद्याप संंभ्रमशासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात पीक कर्ज असा उल्लेख आहे. मात्र, अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदत यापैकी कोणाला कर्जमाफीचा लाभ मिळणार, याबाबत बँकांना स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. केवळ पीक कर्जाचा उल्लेख असल्यामुळे अल्पमुदतीचे पीककर्जच माफ होणार असल्याचे सरकारी व बँकांना सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी