शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

१३६ कोटींच्या निधीला मंजुरी; प्राप्त केवळ अडीच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोनामुळे शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीत ३३ टक्क्यांची कपात केली होती. काही दिवसांपूर्वीच १०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कोरोनामुळे शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीत ३३ टक्क्यांची कपात केली होती. काही दिवसांपूर्वीच १०० टक्के निधी खर्चाला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून जालना जिल्हा परिषदेला २०२०-२१ या वर्षासाठी १३६ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. मात्र, जिल्हा परिषदेला केवळ २ कोटी ६४ लाख रूपयांचा निधीच प्राप्त झाला आहे.

मागील सात ते आठ महिन्यांपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. महसूल न मिळाल्याने शासनाने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीत ३३ टक्क्यांची कपात केली होती. निधी नसल्याने सर्वच कामे ठप्प झाली होती. निधी नसल्याने ओरडही सुरू झाली होती. त्यातच मागील काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. लॉकडाऊन शिथील झाल्याने सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना १०० टक्के निधी खर्चाला मान्यता दिली आहे. त्यानुसार जालना जिल्हा परिषदेला जिल्हा वार्षिक योजनेतून तब्बल १३६ कोटी ६६ लाख रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, शासनाने मंजूर केलेल्या निधीपैकी केवळ २ कोटी ६४ लाख ३२ हजार रूपयांचाच निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला आहे. यामध्ये शिक्षण विभागाला २४ लाख ४९ हजार रुपये, आरोग्य विभागाला ८८ लाख १ हजार रुपये, पंचायत विभाग ६ लाख ८२ हजार रुपये, तर बांधकाम विभागाला १ कोटी ४५ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पशुसंवर्धन, सिंचन, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान या विभागांना अद्यापही निधी मिळालेला नाही.

निधीअभावी विकासकामे रखडली

निधी नसल्यामुळे मागील आठ ते नऊ महिन्यांपासून ग्रामीण भागातील विकासकामे ठप्प आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने निधी खर्चाला मंजुरी दिली खरी परंतु जिल्हा परिषदेकडे निधीच नसल्याने विकासकामे करता येत नाहीत. त्यातच यावर्षी शासनाने मंजुरी दिलेल्या निधीपैकी केवळ दोन कोटी रूपयांचाच निधी आतापर्यंत दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामे पुन्हा रखडली ओहत.

विभागनिहाय मंजूर झालेला निधी

विभाग मंजूर निधी

शिक्षण १४ कोटी ४७ लाख

आरोग्य ३९ कोटी ८८ लाख

पाणीपुरवठा २० लाख

पशुसंवर्धन १ कोटी ७१ लाख

पंचायत १५ कोटी

सिंचन १५ कोटी ५० लाख

बांधकाम ४१ कोटी

महिला व बालकल्याण ८ कोटी ९९ लाख

एकूण १३६ कोटी ६६ लाख

जिल्हा परिषदेला जिल्हा वार्षिक योजनेतून १३६ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. आतापर्यंत २ कोटी ६४ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विभागनिहाय हा निधी देण्यात येत आहे.

- उत्तम चव्हाण, वित्त अधिकारी, जिल्हा परिषद