शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सव्वालाख शेतकरी नवीन कर्जास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:05 AM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेले जिल्ह्यातील एक लाख २३ हजार हजार ८५१ शेतकरी नव्याने कृषी कर्जास पात्र ठरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेले जिल्ह्यातील एक लाख २३ हजार हजार ८५१ शेतकरी नव्याने कृषी कर्जास पात्र ठरले आहेत. त्यामुळे येत्या खरिप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते-औषधी खरेदीसाठी बँकांकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे.राज्यशासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ७५० कुटुंबांनी आॅनलाइन अर्ज केले होते. जिल्ह्यातील २० बँकांच्या १६२ शाखांमध्ये एक लाख २३ हजार ८५१ शेतक-यांचे ५९३ कोटी ६९ लाख हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. यामध्ये दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या ९४ हजार ६१० शेतक-यांचा समावेश आहे. तसेच नियमित कर्जफेड करणा-या २८ हजार ८२५ शेतक-यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ४० कोटी ४७ लाखांची रक्कम शेतक-यांचा खात्यावर जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७ हजार ९५८ शेतक-यांना एकरकमी परतफेड योजने अंतर्गत दीड लाखांपर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफीमुळे थकबाकीदार शेतकरी नव्याने कर्ज घेण्यास पात्र झाले आहेत.