शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:46 IST

पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी लाल किल्ल्यापासून ते काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतात हल्ले केले आहेत, अशी कबुली पाकिस्तानी नेते चौधरी अन्वरुल हक यांनी उघडपणे दिली.

भारताने मागील काही वर्षापासून पाकिस्तानवर दहशतवादाचा आरोप केला आहे. हे आरोप पाकिस्तानी  अधिकाऱ्यांनी ते सातत्याने नाकारले आहेत. आता, एका नेत्यानेच याबाबत उघड-उघड कबुली दिली आहे.  पाकिस्तानी नेते चौधरी अन्वरुल हक यांनी उघडपणे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी "लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत" भारतात हल्ले केले आहेत, असे म्हटले आहे. हक हे पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरचे माजी पंतप्रधान आहेत, त्यांनी सोमवारी अविश्वास प्रस्ताव गमावल्यानंतर राजीनामा दिला. त्यांनी PoJK विधानसभेत हे विधान केले.

सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलंलाल किल्ल्यावरील हल्ल्याचा उल्लेख करणाऱ्या हकच्या कबुलीजबाबावरून १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या कार स्फोटात पाकिस्तानी दहशतवादी सहभागी असल्याचा पुरावा मिळाला आहे. यामध्ये १५ लोकांचा मृत्यू झाला होता. हल्ल्याचा सूत्रधार डॉ. उमर उन नबी हा जैश-ए-मोहम्मदशी जोडलेल्या "व्हाइट-कॉलर" दहशतवादी मॉड्यूलचा सदस्य आहे.

"जंगल्स ऑफ काश्मीर" ही टिप्पणी पहलगाम हल्ल्याचा संदर्भ 

चौधरी अन्वरुल हक यांची "जंगल्स ऑफ काश्मीर" ही टिप्पणी २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भात होती, तिथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल प्रश्न विचारले आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले, यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.

सोमवारी पाकव्याप्त काश्मीर विधानसभेत त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव हरल्यानंतर अन्वरुल हक यांनी हे विधान केले. त्यांच्या भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये ते असे म्हणताना ऐकू येतात की, "जर तुम्ही बलुचिस्तानला रक्ताने भिजवत राहिलात तर आम्ही लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतावर हल्ला करू आणि देवाच्या कृपेने, आमच्या शाहीनने तेच केले आहे. ते अजूनही मृतदेह मोजू शकत नाहीत, असंही त्या नेत्याने म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistani Leader Admits to Attacks from Kashmir to Red Fort.

Web Summary : A Pakistani leader, Chaudhry Anwarul Haq, admitted that Pakistan-based terrorist groups attacked India, from Kashmir's forests to the Red Fort. This confession links Pakistani terrorists to past attacks, including the 2000 Delhi car bombing and the Pahalgam massacre.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतdelhiदिल्लीBlastस्फोट