शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

बिमस्टेकमध्ये पाकिस्तान का नाही? सार्क असूनही नवे संघटन का स्थापन झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 17:23 IST

6 जून 1997 रोजी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोअपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे आहे.

नवी दिल्ली- भारतीय उपखंडामधील देशांसाठी सार्कची स्थापना करण्यात आली आहे. मात्र तरिही आणखी एका संघटनेची म्हणजे बिमस्टेकची निर्मिती का करण्यात आली असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तसेच बिमस्टेकमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मालदीव यांचा समावेश करण्यात आलेला नाही.दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना म्हणजे सार्कचे यश अत्यंत मर्यादित आहे. तसेच पाकिस्तानने सार्कमध्ये नेहमीच असहकाराची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानने आपल्या देशात दहशतवादाला आणि दहशतवादी छावण्यांना मोकळीक दिल्यामुळे भारताने सार्क परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यामुऴे सार्कचे क्षेत्र अत्यंत आकुंचित पावले आहे. त्यामुळेच भारताने बिमस्टेकला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे.  पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी जर पाकिस्तानने जर आपल्या भूमिकेत बदल केला नाही तर पाकला वगळून प्रादेशिक संघटना बनवावी लागेल असे स्पष्ट केले होते. त्यामुळेच बिमस्टेकसारखी संघटना उभी राहिली. आज पाकिस्तान भारतीय उपखंडात इतर देशांपासून वेगळा पडल्याचे दिसून येते.

सात देशांचे बिमस्टेक संघटन6 जून 1997 रोजी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोअपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे आहे. यामध्ये बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान, नेपाळ यांचा समावेश होता. नंतर डिसेंबर महिन्यामध्ये त्यात म्यानमारचा समावेश करण्यात आला. या देशांमध्ये जगातील एकूण लोकसंख्येच्या 22 टक्के लोकसंख्या राहाते. बँकॉक येथे बिमस्टेकच्या गटामार्फत सर्व सदस्य देशांच्या सरकारांशी संपर्क ठेवला जातो. आजवर बिमस्टेकच्या तीन शिखप परिषदा झाल्या आहेत तर मंत्री आणि अधिकारी पातळीवरील अनेक बैठका झाल्या आहेत.

 सदस्य देशांच्या नावाच्या क्रमानुसार या संघटनेचे अध्यक्षपद मिळते. सर्वप्रथम बांगलादेशकडे 1997-99 या काळासाठी अध्यक्षपद होते. त्यानंतर म्यानमार 2001-02, श्रीलंका 2002-03, थायलंड 2003-05. बांगलादेश 2005-06 असे अध्यक्षपद होते. भूतानने नकार दिल्यानंतर 2006-09 या कालावधीसाठी भारताकडे या परिषदेचे अध्यक्षपद होते. हे सर्व देश एकमेकांना 14 विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करतील. त्यात टेलिकॉम, गुन्हे तपासणी, कृषी, पर्यावरण, दहशतवाद उच्चाटन, गरिबी निर्मूलन अशा विषयांचा त्यात समावेश आहे. भारत आणि आग्नेय आशियातील देशांचा संपर्क व व्यापार वृद्धींगत होत आहे. 

 

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतNepalनेपाळBangladeshबांगलादेशBhutanभूतानMyanmarम्यानमारThailandथायलंड