शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

लेख: शाळकरी मुलं का घेताहेत मित्रांचाच जीव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 09:53 IST

मुलांच्या हाती इतकी हिंसक शस्त्रास्त्रं कशी येतात? आपल्याच मित्रांवर, शाळकरी विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवण्याची, आपल्या शिक्षकांना ठार मारण्याची हिंमत त्यांच्यात कुठून येते आणि ही दुर्बुद्धी त्यांना कशी सुचते?

काही दिवसांपूर्वीचीच घटना. ऑस्ट्रियाचं ग्राज शहर. तिथली एक प्रसिद्ध शाळा. सकाळची वेळ. शाळेत सगळी लगबग सुरू. त्याच वेळी त्याच शाळेचा एक माजी विद्यार्थी येतो. त्याच्या हातात बंदूक असते. तिथे जमलेल्या मुलांवर तो अंदाधुंद गोळीबार करतो. त्यानंतर तो स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या करतो. या घटनेत किमान अकरा जण ठार झाले. त्यांत शाळेच्या एका शिक्षिकेचाही समावेश आहे. 

या घटनेमुळे शाळकरी विद्यार्थ्यांमधील हिंसाचाराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. का होतात अशा घटना? मुलांच्या हाती इतकी हिंसक शस्त्रास्त्रं कशी येतात? आपल्याच मित्रांवर, शाळकरी विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवण्याची, आपल्या शिक्षकांना ठार मारण्याची हिंमत त्यांच्यात कुठून येते आणि ही दुर्बुद्धी त्यांना कशी सुचते?

अलीकडच्या काळात ऑस्ट्रियामध्ये या घटना वारंवार घडायला लागल्या असल्या तरी याबाबतीत जगातील सर्वांत समृद्ध आणि विकसित देश अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत दर काही दिवसांत अशा घटना घडल्याच्या पाहायला मिळतात. शाळकरी विद्यार्थ्यांच्या हत्या होण्यात अमेरिकेचं प्रमाण सर्वांत अधिक आहे. मुलांना सहजपणे हत्यारे उपलब्ध होणं, हत्यारं बाळगण्याबाबत पुरेसे कठोर कायदे नसणं आणि शस्त्रास्त्रांची लॉबी लोकांच्या जीवनमरणापेक्षा अधिक महत्त्वाची तसंच बळकट असणं ही कारणं तर त्यामागे आहेतच; पण शाळकरी मुलं इतकी हिंसक का होतात, यामागची कारणं आता अभ्यासकांना आणि संशोधकांना अधिक चिंतेत टाकताहेत.

या संदर्भात नुकताच झालेला एक अभ्यास सांगतो, त्या त्या देशांतलं गनकल्चर. घरातच आई-बापाकडून मुलांना मिळालेली हिंसेची संस्कृती... ही कारणंही त्यामागे आहेत. कुटुंबातील विसंवाद, त्यांच्यातील भांडणं, पालकांचं मुलांवर लक्ष नसणं, मुलांना त्यांची ‘स्पेस’ देण्याच्या नावाखाली पालकांनी स्वत:च्याच मस्तीत मश्गुल राहणं, मुलांमधील मानसिक विकार, नैराश्य... यांमुळेही अशा घटना घडताहेत. त्याकडे कोणाचंच गांभीर्यानं लक्ष नाही. 

अभ्यासकांनी याहीपेक्षा आणखी काही महत्त्वाच्या कारणांकडे लक्ष वेधलं आहे. ही कारणं तर आपल्या खिजगणतीतही नाहीत. पालक, शिक्षक, शाळाही त्यांच्याकडे फारसं गांभीर्यानं पाहत नाहीत. त्यांच्या दृष्टीनं जणू काही या गोष्टीशी आपला काही संबंधच नाही!

मुलं हिंसक का बनतात आणि इतक्या टोकाचा विचार का करतात आणि प्रत्यक्ष तशी कृतीही करतात यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण आहे, सोबतच्याच मुलांनी, मित्र-मैत्रिणींनी सारखं चिडवणं, मानसिक, शारीरिक छळ करणं, धमक्या देणं... यांमुळे वैतागून एका टोकाच्या क्षणी मुलं अशी कृत्यं करतात आणि त्याचं प्रमाण ७५ टक्के आहे. सूडाच्या भावनेनं घडलेल्या घटना ६१ टक्के, तर इतर कारणांमुळे घडलेल्या घटनांचं प्रमाण ५४ टक्के आहे. आपल्याला आणि आपल्या प्रश्नांना आता कोणीच वाली नाही, त्यामुळे हा प्रश्न आता आपणच सोडवला पाहिजे, या हेतूनं बंदुका उचलणाऱ्या मुलांचं प्रमाण ३४ टक्के आहे. नैराश्यामुळे घडलेल्या घटना २७ टक्के, तर कोणीच आपल्याकडे लक्ष देत नाही ना, मग आपणच इतरांचं लक्ष वेधून घेऊ, म्हणून घडलेल्या घटनांचं प्रमाणही २४ टक्के आहे !

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयSchoolशाळा