शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'मी पाकिस्तानात जन्मलेला भारतीय आहे', छाती ठोकून सांगणारे तारेक फतेह कोण होते..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 22:16 IST

ते नेहमी स्वत:ला पाकिस्तानात जन्मलेला भारतीय म्हणायचे. भारतीय वंशाचा असल्याचा त्यांना खूप अभिमान होता.

Tarek Fateh News:पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन लेखक तारेक फतेह(Tarek Fateh) यांचे आज वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या प्रियजनांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांची मुलगी नताशा फतेह हिनेच वडिलांच्या निधनाची बातमी दिली. “पंजाबचा सिंह, भारताचा सुपुत्र, कॅनडाचा प्रेमी, सत्य बोलणारा, न्यायासाठी लढणारा, दलित आणि अत्याचारितांचा आवाज,'' असे तिने आपल्या वडिलांचे वर्ण केले. 

तारेक फतेह असे लेखक, स्तंभलेखक आणि राजकीय विश्लेषक होते, ज्यांची स्वतःची ओळख करुन देण्याची अनोखी पद्धत होती. ते म्हणायचे – “मी पाकिस्तानात जन्मलेला भारतीय आहे. इस्लाममध्ये जन्मलेला पंजाबी, मुस्लिम विवेकाचा कॅनडातील स्थलांतरित, मार्क्सवादी तरुण आणि सलमान रश्दीच्या अनेक मिडनाइट चिल्ड्रनपैकी एक आहे."

कोण होते तारिक फतेह?तारेक फतेह यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1949 रोजी कराची, पाकिस्तान येथे झाला. 1960 आणि 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात डाव्या विद्यार्थी चळवळीत त्यांचा सहभाग होता. पाकिस्तानातील सरकारच्या धोरणांविरुद्ध आणि धर्मांधतेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. या दशकांमध्ये त्यांना दोनदा लष्करी नियमांचा हवाला देऊन तुरुंगवासही भोगावा लागला. जनरल झिया-उल-हक यांनी 1977 मध्ये त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला होता. त्यांना देशात पत्रकार म्हणून काम करण्यापासून रोखण्यात आले.

पाकिस्तानच्या सद्यस्थितीसाठी त्यांनी इस्लामिक कट्टरतावादाला जबाबदार मानले. 1987 मध्ये ते कॅनडाला गेले. त्यांनी कॅनडाला आपले कामाचे ठिकाण बनवले. कॅनडामध्ये ते राजकीय कार्यकर्ते, पत्रकार आणि टेलिव्हिजन होस्ट म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. ते नेहमी सर्व सामाजिक-राजकीय प्रश्नांवर आपले मत मांडायचे.

भारतीय वंशाचा असल्याचा अभिमान आहेते नेहमी स्वत:ला पाकिस्तानात जन्मलेला भारतीय म्हणत असे. भारतीय वंशाचा असल्याचा त्यांना खूप अभिमान होता. ते इस्लामिक कट्टरतावादाचे कट्टर टीकाकार होते. त्यामुळे जगभरातील मुस्लिमांकडून त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. मात्र, विविध माध्यमांतून, ब्लॉगमधून, पुस्तकांतून ते निर्भयपणे आपले विचार मांडत राहिले.

तारेकवर फतवाही काढण्यात आलातारेक फतेह इस्लामिक कट्टरतावादाच्या विरोधात उघडपणे आपले धर्मनिरपेक्ष विचार व्यक्त करण्यासाठी ओळखले जात होते. 2017 मध्ये त्यांनी बुरखा वाद आणि तिहेरी तलाकबाबतही आपले वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांचे विधान गैर इस्लामिक असल्याचे म्हटले होते. त्यांनी भारताला अनेकदा पाठिंबा दिला आणि फाळणीला विरोध केला. बुरखा घालणे आवश्यक नाही आणि तिहेरी तलाक हराम आहे, असे त्यांनी एका टीव्ही कार्यक्रमात सांगितल्यावर अनेकांना राग आला. त्यानंतर बरेली येथील एका मुस्लिम संघटनेने तारेक फतहविरोधात फतवा काढला होता. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयPakistanपाकिस्तानIndiaभारतCanadaकॅनडा