शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 15:51 IST

पाकिस्तान हाफिज सईद आणि मसूद अजहर यांच्यासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्यास तयार आहे. पण...; काय म्हणाले बिलावल भुट्टो?

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, भारताने न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य केल्यास, पाकिस्तान हाफिज सईद आणि मसूद अजहर यांच्यासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्यास तयार आहे.

काय म्हणाले बिलावल भुट्टो?बिलावल भुट्टो यांनी अल-जझीरा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, 'भारत हाफिज सईद (लष्कर-ए-तैयबा प्रमुख) आणि मसूद अजहर (जैश-ए-मोहम्मद प्रमुख) यांना पाकिस्तानात आश्रय दिला जात असल्याचा आरोप करत आहे. या दोघांवर भारतात अनेक गंभीर दहशतवादी हल्ल्यांचे आरोप आहेत आणि भारत त्यांचे प्रत्यार्पण मागत आहे.'

त्यावर उत्तर देताना भुट्टो म्हणाले की, "अशा व्यक्तींना भारताला सुपूर्द करण्यास पाकिस्तानला काही आक्षेप नाही. पण यासाठी एक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. भारताने पुरावे सादर करावेत आणि साक्षीदार पाठवावेत."

मसूद अजहरबाबत पाकिस्तानकडे माहिती नाही!भुट्टो यांनी यावेळी असेही म्हटले की,"पाकिस्तान सरकारकडे मसूद अजहर सध्या कुठे आहे, याची कोणतीही खात्रीशीर माहिती नाही. जर भारताने ठोस आणि विश्वसनीय पुरावे दिले की, तो पाकिस्तानात आहे, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. भारताने त्याचा ठावठिकाणा सांगावा."

कोण आहेत हाफिज सईद आणि मसूद अजहर?हाफिज सईद हा २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असून, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि प्रमुख आहे. तर, मसूद अजहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख असून, २००१चा संसद हल्ला, २०१६ पठाणकोट हल्ला आणि २०१९च्या पुलवामा हल्ल्यासारख्या घटनांचा मुख्य सूत्रधार आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादीIndiaभारत