शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

दुष्काळामुळे बिघडते मानसिक स्वास्थ्य; तज्ज्ञांनी मांडले निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 12:15 IST

आॅस्ट्रेलियातील आग्नेय भागामध्ये १९९७ ते २००१ या काळामध्ये पडलेल्या दुष्काळाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये दुष्काळपीडित ६६४ शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या शेतकऱ्यांच्या मनावर दुष्काळाचा जास्त परिणाम होत असल्याचे दिसून आले.

न्यू यॉर्क- आपल्या मानसिक स्वास्थ्यावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. तापमान, दैनंदिन नातावरणातील बदलांप्रमाणे पाण्याचे दुर्भिक्ष हेसुद्धा मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे कारण असू शकते असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील गेल्या २० वर्षांच्या दुष्काळामुळे कोलोरॅडो नदीमधील पाण्याची पातळी खालावली आहे. ही नदी सात राज्यांमधील ४ कोटी लोकांना पाणी पुरवते. मात्र प्रत्येक राज्याला ठरवल्याप्रमाणे २०२० पर्यंत पाणीवाटप होण्याची केवळ ५७ टक्के इतकीच शक्यता आहे असा अंदाज कोलोरॅडो पब्लिक रेडिओने जाहीर केलेल्या वृत्तात म्हटले आहे.     नासाने २०१७ साली तापमानवृद्धीमुळे अशा प्रकारचे दुष्काळ वारंवार आणि सलग येण्याची शक्यता वर्तवली होती. पण या दुष्काळाचे परिणाम प्रत्येक माणसावरही होत असतात. पाण्याच्या टंचाईमुळे मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आणि चिंताही वाढते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कॅलिफोर्नियातील सार्वजनिक आरोग्याच्या सर्वेक्षणामध्ये दुष्काळग्रस्त सेंट्रल व्हॅलीमधील रहिवाशांनी दुष्काळामुळे त्यांची मानसिक शांतता हरपली तसेच काही लोकांमध्ये चिडचिडेपणा आणि निद्रानाशाचा त्रास झाला असाही अनुभव नोंदवला. बोलिवियामधील पाणीटंचाईचा अभ्यास केल्यावर निरीक्षकांना दुष्काळाचा गरिब आणि कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या मनावर जास्त परिणाम होत असल्याचे दिसून आले. २०१५ साली दुष्काळाच्या ८२ अभ्यासांचे मेटा-अनालसिस करण्यात आले होते. त्यामध्ये दुष्काळामुळे येणाऱ्या आर्थिक संकटांमुळे ताणतणावात वाढ होते आणि सामाजिक एकटेपण येतं असं दिसलं. यामध्ये नैराश्य, चिंता, आत्महत्या या सर्व परिणामांचा समावेश आहे. आॅस्ट्रेलियामधील सात वर्षांच्या दुष्काळाचा अभ्यास केल्यानंतर ग्रामिण जनतेच्या त्रासामध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळले मात्र शहरी लोकांवर परिणाम झाला नसल्याचे आढळले. दुष्काळामुळे पिके नष्ट होणे आणि मनुष्य उपयोगी जनावरांच्या संख्येवर परिणाम होतो त्यामुळे त्रासामध्ये भर पडते असे आॅस्ट्रेलियाच्या सर्वेक्षणाबाबत संशोधकांनी मत व्यक्त केले.दुषित पाण्याच्या बाबतीतही अशाच प्रकारचा अनुभव संशोधकांना आला. २०१६ साली फ्लिंट आणि मिशिगन येथे केलेल्या अभ्यासामध्ये रहिवाशांनी तणाव, चिंता, नैराश्य वाढल्याचे मत व्यक्त केले. आॅस्ट्रेलियातील आग्नेय भागामध्ये १९९७ ते २००१ या काळामध्ये पडलेल्या दुष्काळाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये दुष्काळपीडित ६६४ शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या शेतकऱ्यांच्या मनावर दुष्काळाचा जास्त परिणाम होत असल्याचे दिसून आले. हा अभ्यास मेडिकल जर्नल आॅफ आॅस्ट्रेलियामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.

टॅग्स :droughtदुष्काळHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय