शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

युद्ध नव्हे, चर्चेच्या माध्यमातून सुटेल काश्मीर प्रश्न - इम्रान खान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 09:28 IST

युद्ध नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सुटेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे

ठळक मुद्दे युद्ध नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सुटेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहेकाश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी दोन ते तीन पर्यायांवर चर्चा झाली आहे. मात्र याविषयी एवढ्यात चर्चा करणे घाईचे ठरेलअण्वस्त्रसंपन्न असलेलेल दोन देश युद्ध करू शकत नाही. कारण याचा परिणाम धोकादायक ठरू शकतो

इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य झाल्यापासूनच काश्मीर प्रश्न हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. काश्मीरवरून दोन्ही देशांमध्ये युद्धेही झाली. अनेक दशके उलटल्यानंतरही काश्मीर प्रश्न सुटू शकलेला नाही. मात्र आता युद्ध नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सुटेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नाबाबत भाष्य केले. ''युद्ध नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सोडवता येईल. जोपर्यंत चर्चेला सुरुवात होत नाही, तोपर्यंत काश्मीर प्रश्न सोडवण्याबाबतच्या कुठल्याही पर्यायावर चर्चा करता येणार नाही.'' असे ते म्हणाले. ''काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी दोन ते तीन पर्यायांवर चर्चा झाली आहे. मात्र याविषयी एवढ्यात चर्चा करणे घाईचे ठरेल, ''असे सांगत त्यांनी याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही युद्धाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. ''अण्वस्त्रसंपन्न असलेलेल दोन देश युद्ध करू शकत नाही. कारण याचा परिणाम धोकादायक ठरू शकतो." असे इम्रान खान म्हणाले. भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान गंभीरपणे विचार करत आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि त्यांच्या सरकारचीही हीच भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर