शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आता भारताला शेजारी देशांबरोबर व्यापार करणं होणार सोपं, बिमस्टेक देशांसाठी करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 13:21 IST

मोटर व्हेईकल अॅग्रीमेंट हा करार भारतासह बंगालच्या उपसागरासंबंधी देशांमधील व्यापाराचे स्वरुप पालटून टाकणार आहे.

नवी दिल्ली- बंगालच्या उपसागराच्या जवळ असणाऱ्या सर्व देशांमध्ये रस्तेमार्ग सुधारुन त्यांचा व्यापारासाठी आता उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी बिमस्टेकच्या ( द बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टोरल टेक्नीकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन) च्या सात सदस्यांनी मोटर व्हेइकल अॅग्रीमेंट कराराचा मसुदा तयार केला आहे. जर या मसुद्याप्रमाणे सर्व गोष्टी नीट झाल्या तर भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, थायलंड आणि श्रीलंका या देशांचा व्यापार अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे.आता या कराराच्या मसुद्यावर हे सर्व देश विचार करतील आणि नंतर यावर्ष अखेरीस नेपाळ येथे होत असलेल्या बिमस्टेकच्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा होईल. 1997 मध्ये बिमस्टेकची स्थापना करण्यात आली होती. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी  22 टक्के लोकसंख्या या देशांमध्ये राहाते. मोटर व्हेईकल अॅग्रीमेंटमुळे या देशांमध्ये प्रवास करताना वाहनांना केवळ एका परवान्याच्या मदतीने प्रवास करता येणार आहे. तसेच हा परवाना ऑनलाइनही मिळवता येणार आहे.बिमस्टेकमधील पाच देशांच्या सीमा भारताशी भिडलेल्या आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये असणाऱ्या पेट्रापोल या सीमाकेंद्रावरती मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते आणि आशियातील सर्वात व्यस्त सीमाकेंद्र म्हणून ते ओळखले जाते. भारत आणि बांगलादेश यांच्यामधील 60 टक्के व्यापार या केंद्रावरुन होतो. तसेच रक्सौल या बिहारमधील सीमाकेंद्रातून नेपाळला दररोज 800 ट्रक्स माल जातो.

या सर्व देशांमध्ये मोटर व्हेईकल अॅग्रीमेंटमुळे वाहतूक व मालाची ने-आण वेगाने होणार असली तरी आजवर त्यामध्ये अनेक अडथळे आले. 2014 साली सार्कमध्ये भारताने या कराराचा प्रस्ताव ठेवला होता मात्र त्याचा पाकिस्तानने विरोध केला. 2015 साली बांगलादेश, भारत., नेपाळ आणि भूतान यांच्या बीबीआयएन या संघटनेने त्याला मंजूरी दिली मात्र भूतान संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने त्यास मंजूरी दिली नाही. आता मोटर व्हेईकल अॅग्रीमेंट बिमस्टेक समोर येणार आहे. तेथील सदस्य देशांनी त्यास मंजुरी दिल्यावर मात्र भारतीय़ उपखंडातील देशांना लाभ होणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकIndiaभारतNepalनेपाळBhutanभूतानMyanmarम्यानमार