शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 09:02 IST

Three Indians Kidnaped In Mali: कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांनी तीन भारतीय नागरिकांचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात घडली आहे.

कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांनी तीन भारतीय नागरिकांचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात घडली आहे. भारत सरकारने या घटनेबाबत चिंता व्यक्त केली असून, या भारतीय नागरिकांची सुरक्षित आणि सुखरूप सुटका व्हावी यासाठी सर्व ती आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन माली सरकारला केलं आहे.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या अधिक माहितीनुसार १ जुलै रोजी मालीमधील कायेस येथील डायमंड सिमेंट कारखान्यामध्ये काही सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला. तसेच तिथे काम करत असलेल्या तीन भारतीयांचं अपहरण केलं. या अपहरणाची जबाबदारी अल कायदाशी संबंधित जमात नुसरत अल इस्लाम वल मुस्लिमीन या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. तसेच त्यांनी मालीमध्ये झालेल्या इतर काही दहशतवादी हल्ल्यांचीही जबाबदारी स्वीकारली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, मालीची राजधानी असलेल्या बमाको येथील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासन, तपास यंत्रणा आणि सिमेंट कारखाना व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क ठेवून आहे. तसेच अपहरण करण्यात आलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांशीही सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असून, त्यांनाही प्रत्येक घडामोडीची माहिती दिली जात आहे.

भारत सरकारने या घटनेचा उल्लेख हिंसक आणि अत्यंत निंदनीय कृत्य असा केला आहे. तसेच माली सरकारने या भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी मदत करावी, असं आवाहन केलं आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाने आम्ही भारतीयांना सर्वतोपरी मदत पुरवू, तसेच अपहृत भारतीय नागरिकांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगितले. याबरोबरच भारत सरकारने मालीमध्ये राहणाऱ्या इतर भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचे आणि नियमितपणे दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे.  

टॅग्स :terroristदहशतवादीInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतKidnappingअपहरण