शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 09:02 IST

Three Indians Kidnaped In Mali: कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांनी तीन भारतीय नागरिकांचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात घडली आहे.

कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांनी तीन भारतीय नागरिकांचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात घडली आहे. भारत सरकारने या घटनेबाबत चिंता व्यक्त केली असून, या भारतीय नागरिकांची सुरक्षित आणि सुखरूप सुटका व्हावी यासाठी सर्व ती आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन माली सरकारला केलं आहे.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या अधिक माहितीनुसार १ जुलै रोजी मालीमधील कायेस येथील डायमंड सिमेंट कारखान्यामध्ये काही सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला. तसेच तिथे काम करत असलेल्या तीन भारतीयांचं अपहरण केलं. या अपहरणाची जबाबदारी अल कायदाशी संबंधित जमात नुसरत अल इस्लाम वल मुस्लिमीन या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. तसेच त्यांनी मालीमध्ये झालेल्या इतर काही दहशतवादी हल्ल्यांचीही जबाबदारी स्वीकारली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, मालीची राजधानी असलेल्या बमाको येथील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासन, तपास यंत्रणा आणि सिमेंट कारखाना व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क ठेवून आहे. तसेच अपहरण करण्यात आलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांशीही सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असून, त्यांनाही प्रत्येक घडामोडीची माहिती दिली जात आहे.

भारत सरकारने या घटनेचा उल्लेख हिंसक आणि अत्यंत निंदनीय कृत्य असा केला आहे. तसेच माली सरकारने या भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी मदत करावी, असं आवाहन केलं आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाने आम्ही भारतीयांना सर्वतोपरी मदत पुरवू, तसेच अपहृत भारतीय नागरिकांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगितले. याबरोबरच भारत सरकारने मालीमध्ये राहणाऱ्या इतर भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचे आणि नियमितपणे दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे.  

टॅग्स :terroristदहशतवादीInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतKidnappingअपहरण