गुजरातमधील अहमदाबामध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्याविमानाचाअपघात झाला. या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला. एअर इंडियाचेविमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. यानंतर पूर्ण परिसरात धूर पहायला मिळाला. या अपघाताने जगभरात खळबळ उडाली. दरम्यान, जगभरात विमान प्रवास सुरक्षेच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या.
दरम्यान, आता युक्रेनमधील एरोस्पेस अभियंता तातारेन्को व्लादिमीर निकोलायेविच यांनी एक नवीन विमान डिझाइन केले आहे. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी केबिन विमानापासून वेगळे करता येईल आणि लोकांचे जीव वाचतील.
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
३ वर्षांच्या परिश्रमानंतर डिझाइन तयार केले
तातारेन्को यांनी ३ वर्षांहून अधिक काळ कठोर परिश्रमानंतर हे डिझाइन तयार केले. ते २०१६ मध्ये लोकांसमोर सादर करण्यात आले. त्यांनी एक संकल्पना विमान डिझाइन केले आहे यामध्ये प्रवासी केबिन वेगळे करता येते. त्यानुसार, टेक ऑफ, फ्लाइट किंवा लँडिंग दरम्यान विमानात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, प्रवासी केबिन वेगळे होईल.
या प्रवासी केबिनमध्ये एक पॅराशूट जोडलेले असेल, जे आपोआप उघडेल आणि प्रवासी केबिन हळूहळू खाली उतरू लागेल. जर हे केबिन पाण्यात पडले तर त्याला जोडलेल्या फुगवता येणाऱ्या नळ्या त्याला तरंगत राहण्यास मदत करतील. प्रवाशांच्या सामानासाठी विमानात विशेष व्यवस्था देखील केली जाईल.
केबिन हलकी पण मजबूत असणार
तातारेन्को व्लादिमीर निकोलाविच यांचे म्हणणे आहे की, मानवी चुकांवर नियंत्रण ठेवता येत नाही, परंतु त्यासाठी तयारी करता येते. हे केबिन केवलर आणि कार्बन फायबरपासून बनवले जाईल, जे केवळ हलकेच नाही तर खूप मजबूत देखील असेल.
आता या डिझाइनमुळे विमानांमध्ये अशी व्यवस्था बनवावी की नाही यावर एक नवीन वाद सुरू झाला आहे. डिझाइनचे टीकाकारांचे मत आहे की, वेगळे केबिन नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही, त्यामुळे ते पर्वत, लोकसंख्या असलेल्या भागात किंवा जंगलात पडू शकते.तर अनेकांनी यामध्ये पायलटची अजिबात काळजी घेतली नसल्याचे म्हटले आहे.
अनेकांनी या डिझाईनला समर्थन दिले आहे.यासाठी जास्त किमतीची तिकिटे खरेदी करण्यासही तयार आहेत. ही डिझाइन किती व्यावहारिक असेल हे भविष्यात कळेल. विमान तयार करणे आधीच महाग आहे. अशा परिस्थितीत, जर ही प्रणाली त्यात समाविष्ट केली तर किंमत आणखी वाढू शकते.