शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:36 IST

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये २६५ लोकांचा मृत्यू झाला. यामुळे आता जगभरात विमान अपघातांची चर्चा सुरू आहे.

गुजरातमधील अहमदाबामध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्याविमानाचाअपघात झाला. या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला. एअर इंडियाचेविमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. यानंतर पूर्ण परिसरात धूर पहायला मिळाला. या अपघाताने जगभरात खळबळ उडाली. दरम्यान, जगभरात विमान प्रवास सुरक्षेच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या. 

दरम्यान, आता युक्रेनमधील एरोस्पेस अभियंता तातारेन्को व्लादिमीर निकोलायेविच यांनी एक नवीन विमान डिझाइन केले आहे. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी केबिन विमानापासून वेगळे करता येईल आणि लोकांचे जीव वाचतील.

इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...

३ वर्षांच्या परिश्रमानंतर डिझाइन तयार केले

तातारेन्को यांनी ३ वर्षांहून अधिक काळ कठोर परिश्रमानंतर हे डिझाइन तयार केले. ते २०१६ मध्ये लोकांसमोर सादर करण्यात आले. त्यांनी एक संकल्पना विमान डिझाइन केले आहे यामध्ये प्रवासी केबिन वेगळे करता येते. त्यानुसार, टेक ऑफ, फ्लाइट किंवा लँडिंग दरम्यान विमानात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, प्रवासी केबिन वेगळे होईल.

या प्रवासी केबिनमध्ये एक पॅराशूट जोडलेले असेल, जे आपोआप उघडेल आणि प्रवासी केबिन हळूहळू खाली उतरू लागेल. जर हे केबिन पाण्यात पडले तर त्याला जोडलेल्या फुगवता येणाऱ्या नळ्या त्याला तरंगत राहण्यास मदत करतील. प्रवाशांच्या सामानासाठी विमानात विशेष व्यवस्था देखील केली जाईल.

केबिन हलकी पण मजबूत असणार

तातारेन्को व्लादिमीर निकोलाविच यांचे म्हणणे आहे की, मानवी चुकांवर नियंत्रण ठेवता येत नाही, परंतु त्यासाठी तयारी करता येते. हे केबिन केवलर आणि कार्बन फायबरपासून बनवले जाईल, जे केवळ हलकेच नाही तर खूप मजबूत देखील असेल. 

आता या डिझाइनमुळे विमानांमध्ये अशी व्यवस्था बनवावी की नाही यावर एक नवीन वाद सुरू झाला आहे. डिझाइनचे टीकाकारांचे मत आहे की, वेगळे केबिन नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही, त्यामुळे ते पर्वत, लोकसंख्या असलेल्या भागात किंवा जंगलात पडू शकते.तर अनेकांनी यामध्ये पायलटची अजिबात काळजी घेतली नसल्याचे म्हटले आहे. 

अनेकांनी या डिझाईनला समर्थन दिले आहे.यासाठी जास्त किमतीची तिकिटे खरेदी करण्यासही तयार आहेत. ही डिझाइन किती व्यावहारिक असेल हे भविष्यात कळेल. विमान तयार करणे आधीच महाग आहे. अशा परिस्थितीत, जर ही प्रणाली त्यात समाविष्ट केली तर किंमत आणखी वाढू शकते.

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघातAir Indiaएअर इंडिया