शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दोन देशांमध्ये सहकार्य असावं, गटबाजी असू नये; भारत- जपानच्या वाढत्या मैत्रीनं चीनचा तीळपापड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 09:55 IST

भारत आणि जपानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

ठळक मुद्दे भारत आणि जपानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे. ‘दोन देशांमध्ये सहकार्य असावं, पण गटबाजी असू नये,’ अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे.

बीजिंग, दि.15- भारत आणि जपानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे. ‘दोन देशांमध्ये सहकार्य असावं, पण गटबाजी असू नये,’ अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) या महत्त्वाकांक्षी योजनेला उत्तर म्हणून भारत आणि जपानने फ्रिडम कॉरिडॉरची उभारणी सुरु केल्यानेसुद्धा चीनचा जळफळाट झाला आहे.

भारत आणि जपानमध्ये गुरुवारी १५ सामंजस्य करार झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी हिंदी आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. भारत आणि जपानच्या या वाढत्या मैत्रीमुळे चीनने संताप व्यक्त केला आहे. देशांनी कोणत्याही तणावाविना संवाद साधावा, अशी आमची भूमिका आहे. दोन देशांनी गटबाजी नव्हे, तर सहकार्य करावे,’असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हंटलं आहे. भारत आणि जपानच्या जवळिकीबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना हुआ चुनयिंग यांनी हे उत्तर दिलं आहे. 

जपानकडून भारताला यूएस-२ ही सागरी भागात टेहळणी करणारी विमाने दिली जाणार आहेत. पण या मुद्यावर भाष्य करणं चीनने टाळलं. या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास चिनी प्रवक्त्यांनी नकार दिला. भारताला टेहळणी विमानं देण्याच्या जपानच्या निर्णयामुळे चीनला धक्का बसला आहे. कारण याआधी जपानने कोणत्याही देशासोबत संरक्षण क्षेत्राशी संबंधित वाहनं किंवा सामग्रीच्या विक्रीसाठी करार केलेला नाही. त्यामुळेच जपानच्या या निर्णयामुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जपानच्या सहकार्याने भारतात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन गुरूवारी नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांनी केलं. मुंबई-अहमदाबादला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनमुळेही चीनची चिंता वाढली असल्याचं चित्र पहायला मिळतं आहे. भारतात हायस्पीड ट्रेन प्रकल्प सुरु करण्यासाठी चीनदेखील उत्सुक आहे. नवी दिल्ली आणि चेन्नई दरम्यान हायस्पीड ट्रेन प्रकल्पासाठी करार करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरु आहेत. चीन आणि जपानमध्ये पूर्व चिनी सुमद्रातील बेटांवरुन मोठा वाद सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर जपानने भारताशी करार केल्याने आणि दोन देशांमधील संबंध आणखी मजबूत झाल्याने चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनIndiaभारत