शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

दोन देशांमध्ये सहकार्य असावं, गटबाजी असू नये; भारत- जपानच्या वाढत्या मैत्रीनं चीनचा तीळपापड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 09:55 IST

भारत आणि जपानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

ठळक मुद्दे भारत आणि जपानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे. ‘दोन देशांमध्ये सहकार्य असावं, पण गटबाजी असू नये,’ अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे.

बीजिंग, दि.15- भारत आणि जपानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे. ‘दोन देशांमध्ये सहकार्य असावं, पण गटबाजी असू नये,’ अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) या महत्त्वाकांक्षी योजनेला उत्तर म्हणून भारत आणि जपानने फ्रिडम कॉरिडॉरची उभारणी सुरु केल्यानेसुद्धा चीनचा जळफळाट झाला आहे.

भारत आणि जपानमध्ये गुरुवारी १५ सामंजस्य करार झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी हिंदी आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. भारत आणि जपानच्या या वाढत्या मैत्रीमुळे चीनने संताप व्यक्त केला आहे. देशांनी कोणत्याही तणावाविना संवाद साधावा, अशी आमची भूमिका आहे. दोन देशांनी गटबाजी नव्हे, तर सहकार्य करावे,’असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हंटलं आहे. भारत आणि जपानच्या जवळिकीबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना हुआ चुनयिंग यांनी हे उत्तर दिलं आहे. 

जपानकडून भारताला यूएस-२ ही सागरी भागात टेहळणी करणारी विमाने दिली जाणार आहेत. पण या मुद्यावर भाष्य करणं चीनने टाळलं. या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास चिनी प्रवक्त्यांनी नकार दिला. भारताला टेहळणी विमानं देण्याच्या जपानच्या निर्णयामुळे चीनला धक्का बसला आहे. कारण याआधी जपानने कोणत्याही देशासोबत संरक्षण क्षेत्राशी संबंधित वाहनं किंवा सामग्रीच्या विक्रीसाठी करार केलेला नाही. त्यामुळेच जपानच्या या निर्णयामुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जपानच्या सहकार्याने भारतात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन गुरूवारी नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांनी केलं. मुंबई-अहमदाबादला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनमुळेही चीनची चिंता वाढली असल्याचं चित्र पहायला मिळतं आहे. भारतात हायस्पीड ट्रेन प्रकल्प सुरु करण्यासाठी चीनदेखील उत्सुक आहे. नवी दिल्ली आणि चेन्नई दरम्यान हायस्पीड ट्रेन प्रकल्पासाठी करार करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरु आहेत. चीन आणि जपानमध्ये पूर्व चिनी सुमद्रातील बेटांवरुन मोठा वाद सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर जपानने भारताशी करार केल्याने आणि दोन देशांमधील संबंध आणखी मजबूत झाल्याने चीनचा तीळपापड झाल्याचं पाहायला मिळतं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनIndiaभारत