शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:38 IST

भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी, जगासमोर छाती झोडून घ्यायला सुरुवात केली. मात्र, याचाही भारतावर काहीही परिणाम झाला नाही...

पहलगाम दहशतनादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यानंतर, हा करार पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पाकिस्तानने भारताकडे विनवण्या करायलया सुरुवात केली. मात्र भारताने त्यांच्या या विनवण्यांना काडीचीही किंमत दिली नाही. यावर पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी, जगासमोर छाती झोडून घ्यायला सुरुवात केली. मात्र, याचाही भारतावर काहीही परिणाम झाला नाही. अखेर आता, पाकिस्तानने आपल्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी नवी मार्ग शोधला आहे, मात्र यालाही, यापूर्वीच भारतासह स्थानिकांनीही विरोध दर्शवलेला आहे.

आपल्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी, त्यांची पाण्याची गरज भागवण्यासाठी पाकिस्तानने आता आपली पाणी साठवण क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे. शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी (१ जुलै २०२५) भारतावर पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत असल्याचा आरोप केला आणि म्हणाले, सरकारने पाणी साठवण क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून, डायमर भाषा धरण आणि इतर संसाधनांचा वापर करून, वादग्रस्त नसलेली पाणी साठवण क्षमता निर्माण केली जाईल.

कुठे तयार होतोय डायमर भाषा धरण? -डायमर भाषा धरण हे खैबर पख्तूनख्वातील कोहिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधील डायमर जिल्ह्यांदरम्यान बांधले जात आहे. त्याचे बांधकाम इम्रान खान सरकारच्या काळातच सुरू झाले होते. मात्र, यावर भारताने आक्षेप घेतला आहे. कारण हे धरण बेकायदेशीर भागात बांधले जात होते. एवढेच नाही तर, स्थानिक लोकांचाही या धरणाला विरोध आहे. जोवर त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोवर धरण बांधू दिले जाणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, १९९१ मध्ये प्रांतांमध्ये झालेल्या पाणी करारात पाण्याची क्षमता वाढवण्याची तरतूद आहे. आम्ही आमच्या संसाधनांचा वापर करून पुढील वर्षापर्यंत या धरणाचे काम पूर्ण करू, असेही शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWaterपाणीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला