शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:38 IST

भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी, जगासमोर छाती झोडून घ्यायला सुरुवात केली. मात्र, याचाही भारतावर काहीही परिणाम झाला नाही...

पहलगाम दहशतनादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यानंतर, हा करार पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पाकिस्तानने भारताकडे विनवण्या करायलया सुरुवात केली. मात्र भारताने त्यांच्या या विनवण्यांना काडीचीही किंमत दिली नाही. यावर पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी, जगासमोर छाती झोडून घ्यायला सुरुवात केली. मात्र, याचाही भारतावर काहीही परिणाम झाला नाही. अखेर आता, पाकिस्तानने आपल्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी नवी मार्ग शोधला आहे, मात्र यालाही, यापूर्वीच भारतासह स्थानिकांनीही विरोध दर्शवलेला आहे.

आपल्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी, त्यांची पाण्याची गरज भागवण्यासाठी पाकिस्तानने आता आपली पाणी साठवण क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे. शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी (१ जुलै २०२५) भारतावर पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत असल्याचा आरोप केला आणि म्हणाले, सरकारने पाणी साठवण क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून, डायमर भाषा धरण आणि इतर संसाधनांचा वापर करून, वादग्रस्त नसलेली पाणी साठवण क्षमता निर्माण केली जाईल.

कुठे तयार होतोय डायमर भाषा धरण? -डायमर भाषा धरण हे खैबर पख्तूनख्वातील कोहिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधील डायमर जिल्ह्यांदरम्यान बांधले जात आहे. त्याचे बांधकाम इम्रान खान सरकारच्या काळातच सुरू झाले होते. मात्र, यावर भारताने आक्षेप घेतला आहे. कारण हे धरण बेकायदेशीर भागात बांधले जात होते. एवढेच नाही तर, स्थानिक लोकांचाही या धरणाला विरोध आहे. जोवर त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोवर धरण बांधू दिले जाणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, १९९१ मध्ये प्रांतांमध्ये झालेल्या पाणी करारात पाण्याची क्षमता वाढवण्याची तरतूद आहे. आम्ही आमच्या संसाधनांचा वापर करून पुढील वर्षापर्यंत या धरणाचे काम पूर्ण करू, असेही शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWaterपाणीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला