शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:38 IST

भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी, जगासमोर छाती झोडून घ्यायला सुरुवात केली. मात्र, याचाही भारतावर काहीही परिणाम झाला नाही...

पहलगाम दहशतनादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यानंतर, हा करार पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पाकिस्तानने भारताकडे विनवण्या करायलया सुरुवात केली. मात्र भारताने त्यांच्या या विनवण्यांना काडीचीही किंमत दिली नाही. यावर पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी, जगासमोर छाती झोडून घ्यायला सुरुवात केली. मात्र, याचाही भारतावर काहीही परिणाम झाला नाही. अखेर आता, पाकिस्तानने आपल्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी नवी मार्ग शोधला आहे, मात्र यालाही, यापूर्वीच भारतासह स्थानिकांनीही विरोध दर्शवलेला आहे.

आपल्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी, त्यांची पाण्याची गरज भागवण्यासाठी पाकिस्तानने आता आपली पाणी साठवण क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे. शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी (१ जुलै २०२५) भारतावर पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत असल्याचा आरोप केला आणि म्हणाले, सरकारने पाणी साठवण क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून, डायमर भाषा धरण आणि इतर संसाधनांचा वापर करून, वादग्रस्त नसलेली पाणी साठवण क्षमता निर्माण केली जाईल.

कुठे तयार होतोय डायमर भाषा धरण? -डायमर भाषा धरण हे खैबर पख्तूनख्वातील कोहिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधील डायमर जिल्ह्यांदरम्यान बांधले जात आहे. त्याचे बांधकाम इम्रान खान सरकारच्या काळातच सुरू झाले होते. मात्र, यावर भारताने आक्षेप घेतला आहे. कारण हे धरण बेकायदेशीर भागात बांधले जात होते. एवढेच नाही तर, स्थानिक लोकांचाही या धरणाला विरोध आहे. जोवर त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोवर धरण बांधू दिले जाणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, १९९१ मध्ये प्रांतांमध्ये झालेल्या पाणी करारात पाण्याची क्षमता वाढवण्याची तरतूद आहे. आम्ही आमच्या संसाधनांचा वापर करून पुढील वर्षापर्यंत या धरणाचे काम पूर्ण करू, असेही शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWaterपाणीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला