जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:40 IST2025-06-10T17:40:37+5:302025-06-10T17:40:56+5:30

भारतात एकीकडे गरीबी वेगाने कमी झालेली असताना पाकिस्तानात ती प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. हे वास्तव आज वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे. एवढे माहित असूनही दहशतवाद्यांच्या जन्मदात्याला हीच वर्ल्ड बँक बेलआऊट पॅकेज देत बसली आहे. 

The world is giving bailout packages after bailout, the Pakistani army is eating that money; World Bank has exposed Pakistan poor people... | जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...

जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...

पाकिस्ताना किती कंगाल झाला आहे हे वर्ल्ड बँकेनेच आज जाहीर केले आहे. जग पाकिस्तानला बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देत सुटले आहे, परंतू ते सर्व पैसे पाकिस्तानी लष्कराच्या घशात जात आहेत. या पैशांतून पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांची फौज तयार करत आहे. भारतात एकीकडे गरीबी वेगाने कमी झालेली असताना पाकिस्तानात ती प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. हे वास्तव आज वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे. एवढे माहित असूनही दहशतवाद्यांच्या जन्मदात्याला हीच वर्ल्ड बँक बेलआऊट पॅकेज देत बसली आहे. 

२०१२ ते २०२२ दरम्यान, भारतातील अति गरिबी २७.१% वरून ५.३% पर्यंत कमी झाली. या काळात २६.९ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. पण त्याउलट पाकिस्तानात घडले आहे. पाकिस्तानमधील अति गरिबी ४.९% वरून १६.५% पर्यंत वाढली आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार गरिबी मोजण्यासाठी एक नवीन स्केल निश्चित करण्यात आला आहे. प्रति व्यक्ती प्रतिदिन $3 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना 'अत्यंत गरीब' मानले जाईल. म्हणजेच जवळपास दिवसाला २५६ भारतीय रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असले तरच तो अति गरीबच्या बाहेर असेल. 

२०२२-२३ मध्ये, भारतात ७.५२ कोटी लोक अत्यंत गरिबीत राहत होते. तर २०११-१२ मध्ये ही संख्या ३४.४४ कोटी एवढी प्रचंड होती. २६.९ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. ही लोकसंख्या पाकिस्तानी लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. हे पाकिस्तान पूर्णपणे कर्जावर अवलंबून आहे. त्यांची अर्थव्यवस्था एवढी डबघाईला आली आहे की कितीही कर वाढविला तरी या कर्जाचे हप्ते फेडू शकणार नाही. 

एकट्या आयएमएफकडूनच त्यांनी ४४.५७ अब्ज डॉलर्सची २५ बेलआउट पॅकेजेस घेतले आहेत. जागतिक बँक, आशियाई विकास बँक (एडीबी) आणि इस्लामिक विकास बँकेकडून ३८.८ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे ते वेगळेच. चीनकडून २५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त तर युरोबाँडकडून ७.८ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतलेले आहे. अरब राष्ट्रांनीही पाकिस्तानला कर्जे दिलेली आहेत. यापैकी बरेच देश आणि संस्था हे कर्ज बुडीत खात्यातच मानत आहेत. 

भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्यानुसार कोणतेही बेलआऊट पॅकेज आले की पाकिस्तानी सैन्य त्यात हस्तक्षेप करून त्याची वाटणी करते. मोठा भाग आपल्याला घेते आणि सरकारला थोडा भाग देते. कर्जातील बहुतांश पैसा हा सैन्यालाच जातो. ते त्याचा वापर दहशतवाद्यांसाठी, सैन्याची शस्त्रे घेण्यासाठी करतात आणि देशातील जनतेला वाऱ्यावर सोडतात. बिसारिया यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली आहे. 

Web Title: The world is giving bailout packages after bailout, the Pakistani army is eating that money; World Bank has exposed Pakistan poor people...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.