शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:51 IST

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तानच्या संसद सदस्य मरियम सोलेमानखिल यांनी भारताचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर आरोप केले.

मागील काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. या तणावावरुन जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तानच्या संसद सदस्य मरियम सोलेमानखिल यांचे विधान समोर आले आहे. 'एएनआय' या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांबद्दलही भाष्य केले. मरियम  सोलेमानखिल यांनी पाकिस्तानवर अनेक आरोप केले आणि भारत नेहमीच अफगाणिस्तानचा खरा मित्र राहिला आहे असे म्हटले.

मरियम  सोलेमानखिल म्हणाल्या की 'पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणाव सुरू होता आम्ही अफगाणिस्तानची एकता पाहिली आहे.' अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत उभे आहेत.' 

तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...

मरियम सोलेमानखिल या निर्वासित अफगाणिस्तान संसदेच्या सदस्य आहेत. त्यांचा जन्म १९८४ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये झाला होता. २०१७ मध्ये, त्यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, लॉस एंजेलिसमधून मीडिया स्टडीजमध्ये बीएस पदवी मिळवली. याशिवाय, अफगाणिस्तानात जाण्यापूर्वी त्यांनी अमेरिकेत ब्युटीशियन म्हणूनही काम केले आहे. सोलेमानाखिल यांना तालिबानचा विरोधक म्हणूनही ओळखले जाते.

मरियम सोलेमानखिल यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना मदत केल्याबद्दल भारताचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, संघर्षाच्या काळात अफगाणिस्तानातील जनता भारतासोबत उभी राहिली आहे. मला वाटते की भारत नेहमीच अफगाणिस्तानचा खरा मित्र राहिला आहे. 'मला वाटतं जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि भारतामध्ये युद्ध झालं तेव्हा आम्ही अफगाणिस्तानची एकता पाहिली. अफगाणिस्तानने म्हटले की आम्ही भारतासोबत उभे आहोत. आम्हाला खोटेपणा समजतो, आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहणार नाही, असंही त्यांनी सांगितले. 

'भारताने जे केले ते आवश्यक होते'

भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर मरियम सोलेमानखिल म्हणाल्या की, भारताने जे काही केले ते आवश्यक होते. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. त्यांनी काश्मीरमध्ये घुसून निष्पाप लोकांना मारले. भारताने जे केले ते खूप जबाबदारीने केले. ते दहशतवादी चौक्या, दहशतवादी छावण्या आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आणखी वाढण्यास मदत करणाऱ्या ठिकाणांवर हल्ला करत आहेत.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर