शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नोकरीच्या आमिषाखाली रशियन सैन्यात केलं भरती; पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपानंतर ४५ भारतीयांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 15:43 IST

रशियन सैन्यात भरती झालेल्या ४५ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे.

Russian Army Released Indian Youths:रशिया युक्रेन युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसला असून त्याचा काही प्रमाणात फटका भारतीयांनाही बसला आहे. रशियन सैन्यात भरती झालेल्या किमान ४५ भारतीयांनारशिया-युक्रेन सीमेवर असलेल्या त्यांच्या छावणीतून सोडण्यात आले आहे. फसवणूक करून रशिया युक्रेन युद्धात काम करायला भाग पाडले गेलेले हे ४५ भारतीय तरुण शुक्रवारी पहाटे देशात परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मॉस्को दौऱ्यानंतर रशियाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अद्यापही ५० भारतीय हे रशियाच्या ताब्यात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्यस्थीनंतर रशियन सैन्यात अडकलेल्या ४५ भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ४५ भारतीयांना रशियन सैन्यातून मुक्त करण्यात आले असून सुमारे ५० जणांना लवकरच परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ४५ पैकी ३५ भारतीयांना दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलैमध्ये मॉस्कोला गेले होते, जिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत भारतीयांच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित केला होता.

रशियन सैन्यात भरती झालेल्या भारतीयांचा मुद्दा भारत-रशिया संबंधांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बनला होते. जुलैमध्ये रशियाच्या दौऱ्यावर असताना मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदींनी रशियन सैन्यात सेवा देणाऱ्या भारतीय नागरिकांच्या लवकरात लवकर सुटका करण्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला. यानंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना हे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी ४५ भारतीय देशात परतले आहेत.

भारतीय तरुणांना चांगल्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून काही मध्यस्थांनी रशियाला नेले होते. त्यानंतर त्यांना रशियन सैन्यात भरती करण्यात आले, जिथे ते युक्रेनशी युद्ध लढत होते. अनेक भारतीय तरुणांनी त्यांचे व्हिडीओ शेअर करून त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचला. त्यानंतर या भारतीयांना सोडवण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या. यापैकी सहा भारतीय दोन दिवसांपूर्वी परतले आहेत आणि बरेच जण लवकरच मायदेशी परततील. अजूनही ५० हून अधिक भारतीय नागरिक रशियन सैन्यात सेवा देत आहेत, ज्यांना आम्ही शक्य तितके परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.

माध्यमांच्या वृत्तानुसार, स्थानिक मध्यस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीयांना रशियात येण्याचे आमिष दाखवले होते. नवी दिल्ली ते तामिळनाडूपर्यंत पसरलेल्या मानवी तस्करी नेटवर्कने या पीडितांना रशियात चांगल्या नोकऱ्या देऊ केल्या होत्या. रशियात पोहोचताच त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि त्यांना युद्ध प्रशिक्षण घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी त्याला रशियन सैन्यात भरती करण्यात आले. या तरुणांच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्यांच्या मुलांनी रशियन सरकारी कार्यालयात मदतनीस म्हणून नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र मध्यस्थावर विश्वास ठेवल्याने त्यांची फसवणूक करण्यात आली होती. त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांना सीमेवर युद्ध लढण्यास भाग पाडले गेले. 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी