शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

महाराष्ट्रातील कंपनीच्या सात अभियंत्यांचे अपहरण, अफगाणिस्तानमध्ये तालिबानींचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 05:57 IST

अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात रविवारी सशस्त्र तालिबान्यांनी महाराष्ट्रातील आरपीजी समूहाच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या सात अभियंत्यांचे अपहरण केले.

नवी दिल्ली/काबुल  - अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात रविवारी सशस्त्र तालिबान्यांनी महाराष्ट्रातील आरपीजी समूहाच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या सात अभियंत्यांचे अपहरण केले.आरपीजी समूहाची कंपनी ‘केईसी’ला अफगाणमध्ये इलेक्ट्रिसिटी सब-स्टेशनचे कंत्राट मिळालेले असून, अपहृत अभियंते हे काम करण्यासाठी जात असताना त्यांना पळवून नेण्यात आले. त्यांना घेऊन जात असलेल्या अफगाणी चालकालाही तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे.अपहरणाचा तपशील माहीत करून घेण्यासाठी आम्ही अफगाण अधिकाºयांच्या संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. मंत्रालयाचे प्रवक्ता नवी दिल्लीत म्हणाले की, अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्याची आम्हाला कल्पना आहे. त्याबाबतचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आम्ही अफगाण अधिका-यांच्या संपर्कात आहोत. अफगाणिस्तानात वीज पुरवठ्याचे काम करणा-या भारतीय कंपन्यांत केईसी ही सर्वात मोठी आहे.बाघलानचे गव्हर्नर अब्दुलहाय नेमाती यांनी तालिबान गटाने या कर्मचाºयांचे अपहरण केल्याचे व पुल-ए-खुमरी शहराच्या दांड-ए-शहाबुद्दीन भागात त्यांना नेल्याचे सांगितले. अफगाणिस्तानचे अधिकारी स्थानिक लोकांच्या माध्यमातून तालिबान्यांशी बोलले आहेत. सरकारी कर्मचारी असल्याचे वाटल्यावरून तालिबान्यांनी हे अपहरण केल्याचे नेमाती यांनी म्हटले आहे.आरपीजीचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी आपल्या कर्मचाºयांना सोडवण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मदत करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानCrimeगुन्हाterroristदहशतवादीKidnappingअपहरणIndiaभारत