शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

काश्मीर प्रश्नामध्ये तालिबान हस्तक्षेप करणार नाही; अफगाणिस्तानातील शीख, हिंदूंना संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 07:11 IST

तालिबानी नेते अनास हक्कानी

काबूल : काश्मीरच्या प्रश्नामध्ये तालिबानी अजिबात हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला भारताशी उत्तम संबंध निर्माण करायचे आहेत. अफगाणिस्तानमधील शीख, हिंदूंना तालिबानी कोणतीही इजा करणार नाही. त्यांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल असे तालिबानी नेते अनास हक्कानी यांनी म्हटले आहे.

अनास यांचे वडील जलालुद्दीन हक्कानी यांनी अफगाणिस्तानमध्ये अमेरिका व त्याआधी सोव्हिएत रशियाच्या फौजेशी संघर्ष केला होता. अनास यांचा नातेवाईक सिराजुद्दीन हा हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अनास हक्कानी हे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हक्कानी नेटवर्कमार्फत दहशतवादी कारवाया केल्या जातात हा आरोप चुकीचा आहे. आम्हाला पाकिस्तानचा पाठिंबा नाही. आम्ही तो कधी मागितलाही नव्हता. काश्मीर प्रश्नामध्ये आम्हाला हस्तक्षेप करण्याची कधीही इच्छा नव्हती. तसे आमचे धोरणही नाही. त्यामुळे त्याविरोधात जाऊन तालिबानी कोणतेही कृत्य करणे शक्य नाही.

ते म्हणाले की, अफगाणिस्तानसमोर असलेले सर्व प्रश्न आम्ही टप्प्याटप्प्याने सोडविणार आहोत. आम्ही कोणाशीही चर्चा कऱण्यास तयार आहोत.  अफगाणिस्तानची परकीयांपासून मुक्तता करण्यासाठी आम्ही २० वर्षे संघर्ष केला. मात्र जगभरातील विशेषत: भारतातील प्रसारमाध्यमे तालिबानींबद्दल अतिशय नकारात्मक पद्धतीने लिखाण करत आहेत. तालिबानी नेते अनास हक्कानी यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये तालिबानींनी दिलेल्या लढ्यात पाकिस्तानमध्ये बनविलेल्या एकाही शस्त्राचा वापर करण्यात आला नाही. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान