Taliban’s Muttaqi dares Pak: गुरुवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानची राजधानी काबूल दोन शक्तिशाली स्फोटांनी आणि त्यानंतर झालेल्या गोळीबाराने हादरली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत ही घटना घडली. ही घटना ४८ तासांच्या आत घडली. काबूलच्या सरकारी कार्यालये आणि निवासी भागात हे हल्ले झाले. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी भारत दौऱ्यावर असतानाच हे हल्ले झाल्याने वातावरणं आणखी तापलं आहे. आता अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अशी चूक करु नका असा स्पष्ट इशारा पाकिस्तानला दिला आहे.
काबूलमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटांनंतर, पाकिस्तानने अफगाणिस्तानात कोणताही हल्ला केल्याची नाही कबुली दिली किंवा आरोपांचे खंडन केले. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानने पाकिस्तानच्या आग्नेय सीमावर्ती प्रांत पक्तिका येथे हल्ला केल्याची माहिती दिली. दुसरीकडे भारत दौऱ्यावर असलेले तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनीही काबूलवर पाकिस्तानने हल्ला केल्याचं स्पष्टपणे मान्य केलं नाही. मात्र, त्यांनी हे मान्य केले की देशाच्या सीमेवरील काही भागांमध्ये हल्ले झाले आहेत. यासोबतच त्यांनी पाकिस्तानला ताकीद दिली आहे की त्यांनी अशी चूक पुन्हा करू नये.
काबूलमधील स्फोटांनंतर, पाकिस्तानने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर भारत दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांनी यावर भाष्य केलं. "सीमेजवळील दुर्गम भागात हल्ला झाला आहे. आम्ही पाकिस्तानच्या या कृतीचा निषेध करतो. अशा प्रकारे समस्या सोडवता येणार नाहीत. आम्ही संवादासाठी तयार आहोत. त्यांनी स्वतःच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. ४० वर्षांनंतर अफगाणिस्तानात शांतता आणि प्रगती झाली आहे. ही कोणासाठीही समस्या नसावी. अफगाणिस्तान आता एक स्वतंत्र राष्ट्र आहे. जर येथे शांतता असेल तर लोक काळजी का करतात? आमची परीक्षा घेऊ नका.संबंध दोन्ही बाजूंनी जातात, पण जर तुम्ही (पाकिस्तान) चिथावणी दिली तर ब्रिटिशांना विचारा, जर तुम्ही अमेरिकनांना विचारले, अगदी नाटोलाही, तर ते तुम्हाला सांगतील की अफगाणिस्तानसोबत असे खेळ खेळणे योग्य नाही," असं परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी म्हटलं.
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप सातत्याने केला आहे. तालिबानही पाकिस्तानवर असेच आरोप करत आहे. २०२१ मध्ये अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबान सत्तेत आल्याचा आनंद पाकिस्तानने साजरा केला. मात्र त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. मुत्ताकी यांनी पाकिस्तानवर टीका करताना भारताशी संबंधांबद्दल सकारात्मक भूमिका कायम ठेवली.भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध प्राचीन काळापासून आहेत. अफगाणिस्तान कोणत्याही प्रकारे भारताविरुद्ध आपला भूभाग वापरू देणार नाही, असंही मुत्ताकी म्हणाले.
Web Summary : Following Kabul blasts, Afghanistan's Foreign Minister Muttaqi cautioned Pakistan against repeating aggression. He highlighted historical ties with India, assuring Afghan land won't be used against it. Relations strained since Taliban's rise.
Web Summary : काबुल विस्फोटों के बाद, अफ़गानिस्तान के विदेश मंत्री मुत्तकी ने पाकिस्तान को आक्रमण दोहराने के खिलाफ चेतावनी दी। उन्होंने भारत के साथ ऐतिहासिक संबंधों पर प्रकाश डाला, आश्वासन दिया कि अफ़गान भूमि का उपयोग इसके खिलाफ नहीं किया जाएगा। तालिबान के उदय के बाद से संबंध तनावपूर्ण।