शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: सावधान! अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या सामर्थ्यानं भारताला धोका; CIA च्या माजी अधिकाऱ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 08:47 IST

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील तालिबानी सत्तेमुळे भारताच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातीलतालिबानी सत्तेमुळे भारताच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पाकिस्तानची कुरघोडी आणि भारतीय सीमा सुरक्षित ठेवण्याचं आव्हान भारतासमोर उभं ठाकलं आहे. दक्षिण-पश्चिम आशियात सीआयएचे माजी दहशतवाद विरोधी प्रमुख डगलस लंडन यांनी भारतासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर तालिबानच्या जोरावर पाकिस्तानच्या कुरघोड्या वाढण्याची शक्यता आहे आणि भारतासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे, असं ते म्हणाले. डगलस ३४ वर्षांच्या सेवेनंतर २०१९ साली निवृत्त झाले आहेत. (Taliban in Afghanistan is a matter of concern for India says former CIA officer Douglas London)

पंजशीरच्या अहमद मसूदला तगडा झटका; तालिबानच्या हल्ल्यात फहीम दश्ती ठार

"अफगाणिस्तानात जे झालं ते खूप वाईट झालं. हक्कानी नेटवर्कचे पाकिस्तानच्या सैन्यासोबत चांगले संबंध राहिले आहेत आणि याचीच प्रचिती आपल्याला अफगाणिस्तानमध्ये येत आहे", असं डगलस म्हणाले. 

डगलस यांचं याच महिन्यात 'द रिक्रूटर: स्पाइंग अँड द लॉस्ट आर्ट ऑफ अमेरिकन इंटेलिजन्स' हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात डगलस यांनी २०२० साली यूएस-तालिबान यांच्यातील शांतता कराराला आजवरचा सर्वात वाईट करार म्हणून संबोधलं आहे. 

'आयएसआय'चे प्रमुख अफगाणिस्तानातअफगाणिस्तानातील सरकार स्थापन करण्यासाठी तालिबान वेगानं प्रयत्न करत आहे. यातच पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे प्रमुख देखील अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे. यातच अफगाणिस्तानातील परिस्थिती अजूनही स्थिर नसून यावर इतक्यात काही भूमिका किंवा प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही, असा पवित्रा भारत सरकारनं घेतला आहे. तेथील परिस्थिती स्थिर होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय आता भारतासमोर राहिलेला नाही. 

"सोशल मीडियात येणारे व्हिडिओ आणि बातम्या पाहता हे स्पष्ट दिसून येतं की हा तोच जुना तालिबान आहे. त्यांच्यात कोणताही बदल वगैरे झालेला नाही. त्यांना फक्त शत्रुंची शिकार करणं माहित आहे आणि ते लोकांना मारत सुटले आहेत. महिलांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जात आहे", असं डगलस म्हणाले. 

"भारतासाठी चिंता करण्याचं कारण नक्कीच आहे. विविध जिहादी गट आणि तालिबानचं समर्थन करण्याची पाकिस्तानची निती भारताविरोधात षडयंत्र रचण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील शत्रुत्व पाहूनच तयार झाली आहे हे स्पष्ट दिसून येतं", असंही ते म्हणाले. 

टॅग्स :TalibanतालिबानPakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तान