शहरं
Join us  
Trending Stories
1
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
2
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
3
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
4
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
5
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
6
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
7
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
8
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
9
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
10
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
11
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
12
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
13
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
14
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
15
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
16
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
17
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
18
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
19
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
20
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
Daily Top 2Weekly Top 5

UNमध्ये पाकिस्तानला फटकाणा-या सुषमा स्वराजांचं भाषण उद्धटपणाचं - चिनी मीडिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 15:08 IST

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानवर तीक्ष्ण शब्दांत सुनावणी करणा-या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चिनी मीडियानं 'उद्धट' असे म्हटले आहे. यावरुन पुन्हा एकदा चीननं पाकिस्तानला समर्थन दिल्याचं दिसत आहे.

बीजिंग, दि. 26 - संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानला तीक्ष्ण शब्दांत फटकारणा-या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चिनी मीडियानं 'उद्धट' असे म्हटले आहे. यावरुन पुन्हा एकदा चीननं पाकिस्तानला समर्थन दिल्याचं दिसत आहे. चिनी मीडियानं आरोप करत म्हटले की, गेल्या काही वर्षांमध्ये झालेला आर्थिक विकास आणि परदेशी संबंधांवरुन भारत पाकिस्तानला कमी लेखत आहे. या आरोपासोबत चीननं पाकिस्तानातील दहशतवादाची बाबदेखील स्वीकारली आहे. सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला फटकारत म्हटले होते की,  भारतात आयआयटी आणि आयआयएम स्थापन करण्यात आलेत तेथे पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटना तयार करण्यात आल्या. 

सुषमा स्वराज यांच्या या विधानावरुन चीनच्या सरकारी मीडियानं, भारताचा व्यवहार हा पक्षपाती असल्याचा कांगावा केला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, पाकिस्तानात दहशतवाद आहे, मात्र दहशतवादाचे समर्थन करणं हे देशाचे धोरण आहे का? दहशतवादामुळे पाकिस्तानला काय फायदा होणार आहे? पैसा की सन्मान?, असे प्रश्न उपस्थित करत चीननं पुन्हा एकदा पाकिस्तानचं समर्थन केले आहे. 

'इंडियाज बिगट्री नो मॅच फॉर इट्स अॅम्बिशन' असं शीर्षक असलेल्या संपादकीयमध्ये चिनी मीडिया असेही लिहिले आहे की, गेल्या काही वर्षात झालेल्या अर्थ्यव्यवस्थेचा विकास आणि परदेशी संबंधांवरुन भारत पाकिस्तानला कमी लेखत आहे आणि चीनलाही अहंकार दाखवत आहे. यावरुन भारताला असे वाटत आहे की पाकिस्तान आपल्या शेजारील देशाला घाबरेल आणि अमेरिका तसंच युरोपच्या प्रलोभनात अडकेल,असेही चिनी मीडियानं म्हटले आहे.  

नेमकं काय म्हणाल्या होत्या सुषमा स्वराज?आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक चपराक लगावल्या होत्या. यावेळी त्यांनी भारतावर आरोप करणा-या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांना ज्या देशाने दहशतवाद आणि हिंसेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत तो देश आम्हाला अहिंसा आणि मानवता शिकवत होता, असा टोलाही लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतकं सर्व होऊनही शांततेसाठी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पुढे काय झालं ते सर्वांना माहित आहे अशी आठवण त्यांनी पाकिस्तानला करुन दिली. सोबतच पाकिस्तानला सर्व लक्षात आहे, पण विसरण्याचं नाटक करत असतात अशी टीका केली. 'भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाला, पण कधी तुम्ही एकत्र बसून विचार केला आहे का ? भारताने इतकी प्रगती केली पण दहशतवादी देश म्हणून आपली ओळख निर्माण का झाली हा विचार पाकिस्तानने कधी केला आहे का ? असा सवाल सुषमा स्वराजांनी विचारला होता. पाकिस्तानला तोंड देताना आम्ही देशाच्या विकासात कोणतीही हयगय केली नाही असं सुषमा स्वराजांना ठामपणे सांगितलं. आम्ही आयआयटी उभारले पण तुम्ही लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन, हक्कानी बनवलं. आम्ही वैज्ञानिक तयार केले, आणि तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं होते. जो पैसा तुम्ही दहशतवाद्यांसाठी खर्च करत आहात तो पैसा देशाच्या नागरिकांसाठी वापरलात तर तुमच्या लोकांचं भलं होईल, त्यांचा विकास होईल असा सल्लाच सुषमा स्वराजांनी दिल होता. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दहशतवाद ही आपली प्रमुख समस्या आहे. त्याच्याविरोधात लढण्यासाठी आपण एकजूट झालो पाहिजे. वेगवेगळ्या नजरेने दहशतवादाकडे पाहणं थांबवलं पाहिजे असं आवाहनही केलं होतं. 

टॅग्स :Terrorismदहशतवाद