शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

UNमध्ये पाकिस्तानला फटकाणा-या सुषमा स्वराजांचं भाषण उद्धटपणाचं - चिनी मीडिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 15:08 IST

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानवर तीक्ष्ण शब्दांत सुनावणी करणा-या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चिनी मीडियानं 'उद्धट' असे म्हटले आहे. यावरुन पुन्हा एकदा चीननं पाकिस्तानला समर्थन दिल्याचं दिसत आहे.

बीजिंग, दि. 26 - संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानला तीक्ष्ण शब्दांत फटकारणा-या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चिनी मीडियानं 'उद्धट' असे म्हटले आहे. यावरुन पुन्हा एकदा चीननं पाकिस्तानला समर्थन दिल्याचं दिसत आहे. चिनी मीडियानं आरोप करत म्हटले की, गेल्या काही वर्षांमध्ये झालेला आर्थिक विकास आणि परदेशी संबंधांवरुन भारत पाकिस्तानला कमी लेखत आहे. या आरोपासोबत चीननं पाकिस्तानातील दहशतवादाची बाबदेखील स्वीकारली आहे. सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला फटकारत म्हटले होते की,  भारतात आयआयटी आणि आयआयएम स्थापन करण्यात आलेत तेथे पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटना तयार करण्यात आल्या. 

सुषमा स्वराज यांच्या या विधानावरुन चीनच्या सरकारी मीडियानं, भारताचा व्यवहार हा पक्षपाती असल्याचा कांगावा केला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, पाकिस्तानात दहशतवाद आहे, मात्र दहशतवादाचे समर्थन करणं हे देशाचे धोरण आहे का? दहशतवादामुळे पाकिस्तानला काय फायदा होणार आहे? पैसा की सन्मान?, असे प्रश्न उपस्थित करत चीननं पुन्हा एकदा पाकिस्तानचं समर्थन केले आहे. 

'इंडियाज बिगट्री नो मॅच फॉर इट्स अॅम्बिशन' असं शीर्षक असलेल्या संपादकीयमध्ये चिनी मीडिया असेही लिहिले आहे की, गेल्या काही वर्षात झालेल्या अर्थ्यव्यवस्थेचा विकास आणि परदेशी संबंधांवरुन भारत पाकिस्तानला कमी लेखत आहे आणि चीनलाही अहंकार दाखवत आहे. यावरुन भारताला असे वाटत आहे की पाकिस्तान आपल्या शेजारील देशाला घाबरेल आणि अमेरिका तसंच युरोपच्या प्रलोभनात अडकेल,असेही चिनी मीडियानं म्हटले आहे.  

नेमकं काय म्हणाल्या होत्या सुषमा स्वराज?आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक चपराक लगावल्या होत्या. यावेळी त्यांनी भारतावर आरोप करणा-या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांना ज्या देशाने दहशतवाद आणि हिंसेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत तो देश आम्हाला अहिंसा आणि मानवता शिकवत होता, असा टोलाही लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतकं सर्व होऊनही शांततेसाठी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पुढे काय झालं ते सर्वांना माहित आहे अशी आठवण त्यांनी पाकिस्तानला करुन दिली. सोबतच पाकिस्तानला सर्व लक्षात आहे, पण विसरण्याचं नाटक करत असतात अशी टीका केली. 'भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाला, पण कधी तुम्ही एकत्र बसून विचार केला आहे का ? भारताने इतकी प्रगती केली पण दहशतवादी देश म्हणून आपली ओळख निर्माण का झाली हा विचार पाकिस्तानने कधी केला आहे का ? असा सवाल सुषमा स्वराजांनी विचारला होता. पाकिस्तानला तोंड देताना आम्ही देशाच्या विकासात कोणतीही हयगय केली नाही असं सुषमा स्वराजांना ठामपणे सांगितलं. आम्ही आयआयटी उभारले पण तुम्ही लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन, हक्कानी बनवलं. आम्ही वैज्ञानिक तयार केले, आणि तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं होते. जो पैसा तुम्ही दहशतवाद्यांसाठी खर्च करत आहात तो पैसा देशाच्या नागरिकांसाठी वापरलात तर तुमच्या लोकांचं भलं होईल, त्यांचा विकास होईल असा सल्लाच सुषमा स्वराजांनी दिल होता. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दहशतवाद ही आपली प्रमुख समस्या आहे. त्याच्याविरोधात लढण्यासाठी आपण एकजूट झालो पाहिजे. वेगवेगळ्या नजरेने दहशतवादाकडे पाहणं थांबवलं पाहिजे असं आवाहनही केलं होतं. 

टॅग्स :Terrorismदहशतवाद