शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

UNमध्ये पाकिस्तानला फटकाणा-या सुषमा स्वराजांचं भाषण उद्धटपणाचं - चिनी मीडिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 15:08 IST

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानवर तीक्ष्ण शब्दांत सुनावणी करणा-या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चिनी मीडियानं 'उद्धट' असे म्हटले आहे. यावरुन पुन्हा एकदा चीननं पाकिस्तानला समर्थन दिल्याचं दिसत आहे.

बीजिंग, दि. 26 - संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानला तीक्ष्ण शब्दांत फटकारणा-या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चिनी मीडियानं 'उद्धट' असे म्हटले आहे. यावरुन पुन्हा एकदा चीननं पाकिस्तानला समर्थन दिल्याचं दिसत आहे. चिनी मीडियानं आरोप करत म्हटले की, गेल्या काही वर्षांमध्ये झालेला आर्थिक विकास आणि परदेशी संबंधांवरुन भारत पाकिस्तानला कमी लेखत आहे. या आरोपासोबत चीननं पाकिस्तानातील दहशतवादाची बाबदेखील स्वीकारली आहे. सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला फटकारत म्हटले होते की,  भारतात आयआयटी आणि आयआयएम स्थापन करण्यात आलेत तेथे पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटना तयार करण्यात आल्या. 

सुषमा स्वराज यांच्या या विधानावरुन चीनच्या सरकारी मीडियानं, भारताचा व्यवहार हा पक्षपाती असल्याचा कांगावा केला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, पाकिस्तानात दहशतवाद आहे, मात्र दहशतवादाचे समर्थन करणं हे देशाचे धोरण आहे का? दहशतवादामुळे पाकिस्तानला काय फायदा होणार आहे? पैसा की सन्मान?, असे प्रश्न उपस्थित करत चीननं पुन्हा एकदा पाकिस्तानचं समर्थन केले आहे. 

'इंडियाज बिगट्री नो मॅच फॉर इट्स अॅम्बिशन' असं शीर्षक असलेल्या संपादकीयमध्ये चिनी मीडिया असेही लिहिले आहे की, गेल्या काही वर्षात झालेल्या अर्थ्यव्यवस्थेचा विकास आणि परदेशी संबंधांवरुन भारत पाकिस्तानला कमी लेखत आहे आणि चीनलाही अहंकार दाखवत आहे. यावरुन भारताला असे वाटत आहे की पाकिस्तान आपल्या शेजारील देशाला घाबरेल आणि अमेरिका तसंच युरोपच्या प्रलोभनात अडकेल,असेही चिनी मीडियानं म्हटले आहे.  

नेमकं काय म्हणाल्या होत्या सुषमा स्वराज?आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक चपराक लगावल्या होत्या. यावेळी त्यांनी भारतावर आरोप करणा-या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांना ज्या देशाने दहशतवाद आणि हिंसेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत तो देश आम्हाला अहिंसा आणि मानवता शिकवत होता, असा टोलाही लगावला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतकं सर्व होऊनही शांततेसाठी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पुढे काय झालं ते सर्वांना माहित आहे अशी आठवण त्यांनी पाकिस्तानला करुन दिली. सोबतच पाकिस्तानला सर्व लक्षात आहे, पण विसरण्याचं नाटक करत असतात अशी टीका केली. 'भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाला, पण कधी तुम्ही एकत्र बसून विचार केला आहे का ? भारताने इतकी प्रगती केली पण दहशतवादी देश म्हणून आपली ओळख निर्माण का झाली हा विचार पाकिस्तानने कधी केला आहे का ? असा सवाल सुषमा स्वराजांनी विचारला होता. पाकिस्तानला तोंड देताना आम्ही देशाच्या विकासात कोणतीही हयगय केली नाही असं सुषमा स्वराजांना ठामपणे सांगितलं. आम्ही आयआयटी उभारले पण तुम्ही लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन, हक्कानी बनवलं. आम्ही वैज्ञानिक तयार केले, आणि तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं होते. जो पैसा तुम्ही दहशतवाद्यांसाठी खर्च करत आहात तो पैसा देशाच्या नागरिकांसाठी वापरलात तर तुमच्या लोकांचं भलं होईल, त्यांचा विकास होईल असा सल्लाच सुषमा स्वराजांनी दिल होता. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दहशतवाद ही आपली प्रमुख समस्या आहे. त्याच्याविरोधात लढण्यासाठी आपण एकजूट झालो पाहिजे. वेगवेगळ्या नजरेने दहशतवादाकडे पाहणं थांबवलं पाहिजे असं आवाहनही केलं होतं. 

टॅग्स :Terrorismदहशतवाद