शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

पुन्हा सर्जिकल स्ट्राइक?; म्हणून पाकिस्तानींना सतावतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 07:16 IST

पाकचे माजी उच्चायुक्त बासीत यांचा दावा, पूंछमधील हल्ल्यानंतर शक्यता वाढली

इस्लामाबाद : भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करू शकतो, अशी पाकिस्तानच्या मनात भीती आहे. तसे वक्तव्य पाकिस्तानचेभारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी केले आहे. २० एप्रिलला पूंछमध्ये भारतीय जवानांवर हल्ला झाला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या भीतीने पुन्हा डोके वर काढले आहे, असे बासीत यांनी सांगितले.

बासीत यांनी यूट्यूब चॅनलवर टाकलेल्या व्हिडीओत हा मुद्दा मांडला. ‘एससीओ’च्या बैठकीसाठी पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो भारतात येणार आहेत. त्यापूर्वी बासीत यांनी हे वक्तव्य केले. 

२९ सप्टेंबर २०१६ उरी येथे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात ११ भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने सीमा ओलांडून पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून ५० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

२६ फेब्रुवारी २०१९ पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४६ जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राइक करून बालाकोट येथील दहशतवादी तळ नष्ट करून ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला हाेता.

पाकिस्तानच्या कुरापती सुरूचपाकने गेल्या सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीतही काश्मीर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्या कांगाव्यालाही भारताने खणखणीत उत्तर दिले होते.  ३७० कलम, तसेच जम्मू- काश्मीरला असलेला विशेष दर्जाही केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्दबातल केला होता. त्याला पाकिस्तानने विरोध केला होता. यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला. 

जम्मू-काश्मीर, लडाख आमचाच अविभाज्य भाग : भारतn काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने खडसावले. n कितीही कांगावा केला तरी जम्मू-काश्मीर, लडाख हा आमचाच अविभाज्य भाग आहे व यापुढेही राहील, असे भारताने बजावले आहे. n पाकचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी काश्मीर प्रश्नाचा उल्लेख केला होता. n त्यास भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी प्रतीक माथूर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

पाकिस्तानने काश्मीरबद्दल कितीही कांगावा, तसेच अपप्रचार केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जम्मू- काश्मीर, लडाख हे भारताचाच अविभाज्य भाग आहेत.     - प्रतीक माथूर 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerror Attackदहशतवादी हल्ला