शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा सर्जिकल स्ट्राइक?; म्हणून पाकिस्तानींना सतावतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 07:16 IST

पाकचे माजी उच्चायुक्त बासीत यांचा दावा, पूंछमधील हल्ल्यानंतर शक्यता वाढली

इस्लामाबाद : भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करू शकतो, अशी पाकिस्तानच्या मनात भीती आहे. तसे वक्तव्य पाकिस्तानचेभारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी केले आहे. २० एप्रिलला पूंछमध्ये भारतीय जवानांवर हल्ला झाला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या भीतीने पुन्हा डोके वर काढले आहे, असे बासीत यांनी सांगितले.

बासीत यांनी यूट्यूब चॅनलवर टाकलेल्या व्हिडीओत हा मुद्दा मांडला. ‘एससीओ’च्या बैठकीसाठी पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो भारतात येणार आहेत. त्यापूर्वी बासीत यांनी हे वक्तव्य केले. 

२९ सप्टेंबर २०१६ उरी येथे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात ११ भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने सीमा ओलांडून पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून ५० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

२६ फेब्रुवारी २०१९ पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४६ जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राइक करून बालाकोट येथील दहशतवादी तळ नष्ट करून ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला हाेता.

पाकिस्तानच्या कुरापती सुरूचपाकने गेल्या सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीतही काश्मीर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्या कांगाव्यालाही भारताने खणखणीत उत्तर दिले होते.  ३७० कलम, तसेच जम्मू- काश्मीरला असलेला विशेष दर्जाही केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्दबातल केला होता. त्याला पाकिस्तानने विरोध केला होता. यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला. 

जम्मू-काश्मीर, लडाख आमचाच अविभाज्य भाग : भारतn काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने खडसावले. n कितीही कांगावा केला तरी जम्मू-काश्मीर, लडाख हा आमचाच अविभाज्य भाग आहे व यापुढेही राहील, असे भारताने बजावले आहे. n पाकचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी काश्मीर प्रश्नाचा उल्लेख केला होता. n त्यास भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी प्रतीक माथूर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

पाकिस्तानने काश्मीरबद्दल कितीही कांगावा, तसेच अपप्रचार केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जम्मू- काश्मीर, लडाख हे भारताचाच अविभाज्य भाग आहेत.     - प्रतीक माथूर 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerror Attackदहशतवादी हल्ला