शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 3:52 PM

पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबादवर अवैधरित्या ताबा मिळविला आहे. मंगळवारी आयएमडीने या भागाचा समावेश अनुमानामध्ये केला आहे. या अनुमानामध्ये गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबादचा उल्लेख करणे भारताचे मोठे पाऊल मानले जात आहे. भारताने या भागावर पाकिस्तानला कोणताही हक्क नसल्याचे म्हटले होते.

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यातच पाकिस्तानला गिलगिट-बाल्टिस्तान तत्काळ खाली करण्याचा इशारा दिला होता. पाकिस्तानला तिथे अनधिकृतरित्या ताबा घेतल्याचे सुनावले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी भारतीय हवामान विभागाने जम्‍मू-काश्‍मीरच्या सब डिव्हीजनला आता जम्‍मू आणि कश्‍मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबाद म्हणण्यास सुरुवात केली आहे. यावरून पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली असून एलओसीवर तणाव वाढू लागला आहे. 

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर अचानक लढाऊ विमानांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सीमेममध्ये एफ-16, जेएफ-17 आणि मिराज III ही लढाऊ विमाने अचानक उड्डाण घेऊ लागली आहेत. याबाबतचे वृत्त आज तकने दिले आहे. पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबादवर अवैधरित्या ताबा मिळविला आहे. मंगळवारी आयएमडीने या भागाचा समावेश अनुमानामध्ये केला आहे. या अनुमानामध्ये गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबादचा उल्लेख करणे भारताचे मोठे पाऊल मानले जात आहे. भारताने या भागावर पाकिस्तानला कोणताही हक्क नसल्याचे म्हटले होते. पाकिस्तानी न्यायालयाने या ठिकाणी निवडणूक घेण्याचा निर्णय दिला होता. यानंतर भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तांना बोलावून सुनावले होते. यानंतर पाकिस्तानने सीमेवर गोळीबार सुरु केला होता. 

सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात हंदवाडामध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह पाच जवान शहीद झाले होते. यामुळे पाकिस्तान घाबरलेला आहे. भारताकडून हवाई हल्ला किंवा सर्जिकल स्ट्राईकसारखी कारवाई होण्याच्या भीतीने लढाऊ विमानांची हालचाल वाढविण्यात आली आहे. 

भारतीय सीमारेषेजवळून पाकिस्तानची एफ-16, जेएफ-17 आणि मिराज III लढाऊ विमाने झेपावू लागली आहेत. पाकिस्तानच्या या हालचालींमुळे भारतीय सैन्यही सतर्क झाले असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच भारतीय हवाई दलालाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानी विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी भारत Airborne Warning And Control System (AWACS) चा वापर करत आहे. 

गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत झालेल्या झटापटीत भारतीय हवाईदलाने पाकिस्तानचे एफ१६ विमान पाडले होते. यानंतर पाकिस्तानने हवाई हद्द बंद केली होती. हे विमान पाडताना भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने ते पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते. मात्र, मुत्सद्देगिरी करत त्यांना परत भारतात आणण्यात आले होते. 

महत्वाच्या बातम्या...

Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी

पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा

रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात

टॅग्स :POK - pak occupied kashmirपीओकेPakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दलTerror Attackदहशतवादी हल्ला