शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

श्रीलंकेतील राजकीय संकट वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 04:19 IST

राजपक्षेंनी पदभार स्वीकारला; ...तर रस्त्यांवर रक्तपात होईल -अध्यक्ष जयसूर्यांचा इशारा

कोलंबो : श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला, तर बरखास्त करण्यात आलेले पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी संसदेत बहुमत असल्याचा दावा केला आहे. जर या संकटावर तोडगा काढण्यात आला नाही, तर रस्त्यांवर रक्तपात होईल, असा इशारा अध्यक्ष कारू जयसूर्या यांनी दिला आहे. नव्या मंत्रिमंडळालाही शपथ देण्यात आली असून यात १२ मंत्री आहेत. यात एक राज्यमंत्री व एक उपमंत्री आहे. राजपक्षे यांच्याकडे अर्थमंत्रीपद आहे.राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून बरखास्त केल्यानंतर श्रीलंकेत राजकीय संकट उभे ठाकले आहे. त्यातच अर्जुन रणतुंगा यांच्या अटकेने तणाव अधिकच वाढला आहे. राष्ट्रपती सिरिसेना यांनी शुक्रवारी रात्री विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून बरखास्त केले होते. त्यानंतर राजपक्षे यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली होती. राष्ट्रपतींचा हा निर्णय घटनाबाह्य आहे. श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार पंतप्रधानांना काढून टाकण्याचा वा पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही. (वृत्तसंस्था)रणतुंगा यांना अटकश्रीलंकेचे पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना सोमवारी अटक करण्यात आली. रणतुंगा यांच्या सुरक्षारक्षकाने रविवारी पंतप्रधान राजपक्षे यांच्या समर्थकांवर गोळीबार केला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता. रणतुंगा हे माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे विश्वासू मानले जातात. क्रिकेटर ते राजकीय नेता असा रणतुंगा यांचा प्रवास आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका