शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पाक पंतप्रधान इम्रान खान यांची पोकळ धमकी; यापुढे भारताशी चर्चा नाही तर आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 15:09 IST

आम्ही भारताशी चर्चा करण्याचा अनेकदा प्रयत्न केले. त्यात कोणतीही कसर ठेवली नाही

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी सरकारशी आता संवाद शक्य नाही असं सांगितलं आहे. अमेरिकेतील दैनिक न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खाननेभारतावर गंभीर आरोप लावलेत. त्यांनी सांगितलं की, दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत त्यात लढाई झाली तर धोका वाढत जाईल. भारताकडून जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्यानंतर पाकिस्तान सैरभैर झालं आहे. इम्रान खान आणि त्यांचे मंत्रीही युद्धाची भाषा बोलत आहेत. 

एका प्रश्नाला उत्तर देताना पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानने सांगितले की, आम्ही भारताशी चर्चा करण्याचा अनेकदा प्रयत्न केले. त्यात कोणतीही कसर ठेवली नाही. मात्र मला वाटतं की, भारताला आणि त्यांच्या पंतप्रधानांना अशाप्रकारचा कोणताही संवाद ठेवण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळे आता भारताशी चर्चा होणार नाही हे स्पष्ट आहे. 

यापुढे इम्रान खान यांनी सांगितले की, मी दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केले. पण जेव्हा पुन्हा मागे वळून पाहतो तेव्हा असं वाटतं की, शांतता आणि चर्चेसाठी मी करत असलेले प्रयत्न अयशस्वी ठरतायेत. माझ्या प्रयत्नांचा वापर त्यांनी काही लोकांना खूश करण्यासाठी केला. आता यामध्ये आम्ही जास्त काही करु शकत नाही. त्यामुळे दोन्ही अण्वस्त्र असणारे देशांमध्ये युद्धाचा धोका वाढत चालला आहे. इम्रान खानने ही मुलाखत इस्लामाबादच्या ऑफिसमधून दिली. 

या मुलाखतीपूर्वी इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बातचीत केली. काश्मीरमधील परिस्थिती नाजूक असल्याचं इम्रानने ट्रम्प यांना सांगितले. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींशी अर्धातास फोनवरून चर्चा केली होती.

पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई केली जाऊ शकते अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव विकोपाला जाऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा इम्रान खान यांनी दिला आहे.  कलम 370 हटविणे आणि जम्मू काश्मीरचं पूनर्रचना करून लडाख स्वतंत्र केंद्रशासित राज्य निर्माण करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानIndiaभारतPakistanपाकिस्तान