शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पाक पंतप्रधान इम्रान खान यांची पोकळ धमकी; यापुढे भारताशी चर्चा नाही तर आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 15:09 IST

आम्ही भारताशी चर्चा करण्याचा अनेकदा प्रयत्न केले. त्यात कोणतीही कसर ठेवली नाही

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी सरकारशी आता संवाद शक्य नाही असं सांगितलं आहे. अमेरिकेतील दैनिक न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खाननेभारतावर गंभीर आरोप लावलेत. त्यांनी सांगितलं की, दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत त्यात लढाई झाली तर धोका वाढत जाईल. भारताकडून जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्यानंतर पाकिस्तान सैरभैर झालं आहे. इम्रान खान आणि त्यांचे मंत्रीही युद्धाची भाषा बोलत आहेत. 

एका प्रश्नाला उत्तर देताना पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानने सांगितले की, आम्ही भारताशी चर्चा करण्याचा अनेकदा प्रयत्न केले. त्यात कोणतीही कसर ठेवली नाही. मात्र मला वाटतं की, भारताला आणि त्यांच्या पंतप्रधानांना अशाप्रकारचा कोणताही संवाद ठेवण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळे आता भारताशी चर्चा होणार नाही हे स्पष्ट आहे. 

यापुढे इम्रान खान यांनी सांगितले की, मी दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केले. पण जेव्हा पुन्हा मागे वळून पाहतो तेव्हा असं वाटतं की, शांतता आणि चर्चेसाठी मी करत असलेले प्रयत्न अयशस्वी ठरतायेत. माझ्या प्रयत्नांचा वापर त्यांनी काही लोकांना खूश करण्यासाठी केला. आता यामध्ये आम्ही जास्त काही करु शकत नाही. त्यामुळे दोन्ही अण्वस्त्र असणारे देशांमध्ये युद्धाचा धोका वाढत चालला आहे. इम्रान खानने ही मुलाखत इस्लामाबादच्या ऑफिसमधून दिली. 

या मुलाखतीपूर्वी इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बातचीत केली. काश्मीरमधील परिस्थिती नाजूक असल्याचं इम्रानने ट्रम्प यांना सांगितले. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींशी अर्धातास फोनवरून चर्चा केली होती.

पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई केली जाऊ शकते अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव विकोपाला जाऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा इम्रान खान यांनी दिला आहे.  कलम 370 हटविणे आणि जम्मू काश्मीरचं पूनर्रचना करून लडाख स्वतंत्र केंद्रशासित राज्य निर्माण करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानIndiaभारतPakistanपाकिस्तान