शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारताच्या मिशन शक्तीमुळे अंतराळ स्थानकाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 08:11 IST

भविष्यातील मोहिमांसाठी नाही अनुकूल : ‘नासा’चे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टीन

वॉशिंग्टन : भारताने त्याच्या उपग्रहांपैकी एक पाडून टाकल्यामुळे त्याचे ४०० तुकडे निर्माण झाले व आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (आयएसएस) धोक्यात आणले, ही एक भयंकर बाब आहे, असे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने मंगळवारी म्हटले.गेल्या आठवड्यात भारतानेमिशन शक्तीद्वारे लो अर्थ आॅर्बिट उपग्रह यशस्वीपणे लक्ष्य करून पाडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांचे हे अभूतपूर्व यश असल्याचे व त्यामुळे भारत अंतराळात शक्तिमान देश बनल्याचे म्हटले होते.

भारताने गेल्या आठवड्यात उपग्रहविरोधी शस्त्रांच्या केलेल्या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले असल्याचे ब्रिडेन्स्टीन म्हणाले. सगळ्याच तुकड्यांचा शोध घेता येईल एवढे काही ते सर्व मोठे नाहीत. नासा सध्या १० सेंटिमीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या तुकड्यांचा शोध घेत आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत ६० तुकडे शोधण्यात आले असून, त्यापैकी २४ तुकड्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला धोका निर्माण केलेला आहे. भारताने केलेल्या या एसॅट चाचणीविरुद्ध जाहीरपणे बोलणारे ब्रिडेन्स्टीन हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील पहिले वरिष्ठ अधिकारी आहेत. भयंकर घटनानासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टीन म्हणाले की, पाडण्यात आलेल्या उपग्रहाचे सुमारे ६० तुकडे आतापर्यंत सापडले असून, त्यापैकी २४ तुकडे आयएसएसच्या कृत्रिम उपग्रहाच्या कक्षेतील पृथ्वीपासून सर्वात दूर असलेल्या बिंदूच्या बाहेर सापडले आहेत. उपग्रहाचा मलबा (डेब्रिस) निर्माण करणे आणि आयएसएसच्या सर्वोच्च बिंदूच्याही वर तो जाणे ही भयंकर घटना आहे. अशा प्रकारची घटना भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी अनुकूल नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्तीisroइस्रोAmericaअमेरिकाNASAनासाIndiaभारत