शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणीकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
5
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
6
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
8
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
9
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
10
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
11
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
13
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
14
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
15
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
16
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
17
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
18
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
19
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
20
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

... म्हणून 85 वर्षीय दलाई लामांबद्दल चीनला प्रचंड राग, जाणून घ्या राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 13:31 IST

सन 1409 मध्ये सिखांपाने जेलग शाळेची स्थापना केली होती, या शाळेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार करण्यात आला. भारत आणि चीनच्या सीमारेषेवरील भागात असून तिला तिबेट नावाने ओळखले जात

ठळक मुद्दे सन 1409 मध्ये सिखांपाने जेलग शाळेची स्थापना केली होती, या शाळेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार करण्यात आला.साधारण 40 वर्षांनंतर चीनच्या लोकांनी तिबेटवर आक्रमण केले, त्यावेळी 14 वे दलाई लामा तिबेटचे गुरु होते. या लढाईत तिबेटला पराभवाचा सामना करावा लागला

मुंबई - भारत आणि चीनमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दलाई लामा यांच्या वाढदिवसाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीदलाई लामा यांना जाहीरपणे शुभेच्छा देतील का? असाही प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन आहे. चीन आणि तिबेटमधील इतिहासकालीन संघर्षामुळे दलाई लामांसदर्भातील आपल्या भूमिकेवर भारत पुन्हा विचार करेल असे अनेकांना वाटते. 

सन 1409 मध्ये सिखांपाने जेलग शाळेची स्थापना केली होती, या शाळेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार करण्यात आला. भारत आणि चीनच्या सीमारेषेवरील भागात असून तिला तिबेट नावाने ओळखले जात. याच शाळेतील सर्वात लोकप्रिय विद्यार्थी म्हणजे गेंदुन द्रुप. पुढे जाऊन हेच गेंदुन पहिले दलाई लामा बनले. बौद्ध धर्माचे अनुयायी दलाई लामा यांना रुपकच्या रुपाने पाहतात. मुख्यत्वे दलाई लामा यांना शिक्षक म्हणून पाहिले जाते, लामा या शब्दाचा अर्थच गुरु असा आहे. आपल्या अनुयायांना सरळ मार्गाने चालण्याची शिकवण लामांकडून देण्यात येते. तिबेटी बौद्ध धर्माचे नेते हे जगभरातील सर्वच बौद्धांना मार्गदर्शन करतात. 

सन 1630 सालीच तिबेटच्या एकीकरणा काळापासूनच तिबेटी आणि बौद्ध नेतृत्वात संघर्ष सुरु होता. मान्चु, मंगोल आणि ओइरात या गटांमध्ये सत्तेसाठी लढाई होत होती. अखेर पाचव्या दलाई लामा यांनी पुढाकार घेऊन तिबेटला एकत्र करण्यात यश मिळवले. त्यानंतर, तिबेट सांस्कृतिक रुपाने संपन्न होऊन पुढे आला. त्यासोबतच येथे बौद्ध धर्मही वाढीस लागला. जेलग बौद्धांनी 14 व्या दलाई लामासही मान्यता दिली.

 

साधारण 40 वर्षांनंतर चीनच्या लोकांनी तिबेटवर आक्रमण केले, त्यावेळी 14 वे दलाई लामा तिबेटचे गुरु होते. या लढाईत तिबेटला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, काही वर्षांनी तिबेटी नागरिकांना चीनविरोधात संघर्ष सुरु केला. तसेच, स्वतंत्र तिबेटची मागणीही करण्यात आली, पण तिबेटला या लढाईत यश मिळाले नाही. त्यावेळी, आपण चीनच्या आक्रमणात आपण अडकल्याची जाणीव दलाई लामा यांना झाली. दरम्यानच्या काळात दलाई लामा यांनी भारताकडे आगेकूच केली. त्यावेळी, 1959 साली दलाई लामा यांच्यासमवेत मोठ्या संख्येने तिबेटी नागरिकही भारतात आले.  

भारताने दलाई लामा यांना शरण दिल्याचे चीनला आवडले नाही, त्यावेळी चीनमध्ये माओत्से संग यांचे सरकार होते. यानंतर चीन व दलाई लामा यांच्यातील तणाव अधिकच वाढत गेला. दलाई लामा यांना जगभरातून सहानुभूती मिळाली, तरी आजही ते निर्वासित म्हणूनच जीवन जगत आहेत. सन 1989 साली दलाई लामा यांना शांतीचा नोबेल देण्यात आला. आता चीनपासून स्वातंत्र्य नको, पण स्वावलंबनाची गरज असल्याचं लामा यांना वाटतं. सन 1950 साली दलाई लामा आणि चीनमध्ये सुरु झालेला वाद आजही कायम आहे. दलाई लामा भारतात राहत असल्यानेच चीनला भारताबद्दल नेहमीच राग आहे.  

टॅग्स :chinaचीनDalai Lamaदलाई लामाBorderसीमारेषाNarendra Modiनरेंद्र मोदी