शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
4
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
5
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
6
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
7
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
8
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
9
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
10
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
11
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
12
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
13
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
14
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
15
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
16
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
17
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
18
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
19
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
20
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!

... म्हणून 85 वर्षीय दलाई लामांबद्दल चीनला प्रचंड राग, जाणून घ्या राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 13:31 IST

सन 1409 मध्ये सिखांपाने जेलग शाळेची स्थापना केली होती, या शाळेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार करण्यात आला. भारत आणि चीनच्या सीमारेषेवरील भागात असून तिला तिबेट नावाने ओळखले जात

ठळक मुद्दे सन 1409 मध्ये सिखांपाने जेलग शाळेची स्थापना केली होती, या शाळेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार करण्यात आला.साधारण 40 वर्षांनंतर चीनच्या लोकांनी तिबेटवर आक्रमण केले, त्यावेळी 14 वे दलाई लामा तिबेटचे गुरु होते. या लढाईत तिबेटला पराभवाचा सामना करावा लागला

मुंबई - भारत आणि चीनमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दलाई लामा यांच्या वाढदिवसाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीदलाई लामा यांना जाहीरपणे शुभेच्छा देतील का? असाही प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन आहे. चीन आणि तिबेटमधील इतिहासकालीन संघर्षामुळे दलाई लामांसदर्भातील आपल्या भूमिकेवर भारत पुन्हा विचार करेल असे अनेकांना वाटते. 

सन 1409 मध्ये सिखांपाने जेलग शाळेची स्थापना केली होती, या शाळेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार करण्यात आला. भारत आणि चीनच्या सीमारेषेवरील भागात असून तिला तिबेट नावाने ओळखले जात. याच शाळेतील सर्वात लोकप्रिय विद्यार्थी म्हणजे गेंदुन द्रुप. पुढे जाऊन हेच गेंदुन पहिले दलाई लामा बनले. बौद्ध धर्माचे अनुयायी दलाई लामा यांना रुपकच्या रुपाने पाहतात. मुख्यत्वे दलाई लामा यांना शिक्षक म्हणून पाहिले जाते, लामा या शब्दाचा अर्थच गुरु असा आहे. आपल्या अनुयायांना सरळ मार्गाने चालण्याची शिकवण लामांकडून देण्यात येते. तिबेटी बौद्ध धर्माचे नेते हे जगभरातील सर्वच बौद्धांना मार्गदर्शन करतात. 

सन 1630 सालीच तिबेटच्या एकीकरणा काळापासूनच तिबेटी आणि बौद्ध नेतृत्वात संघर्ष सुरु होता. मान्चु, मंगोल आणि ओइरात या गटांमध्ये सत्तेसाठी लढाई होत होती. अखेर पाचव्या दलाई लामा यांनी पुढाकार घेऊन तिबेटला एकत्र करण्यात यश मिळवले. त्यानंतर, तिबेट सांस्कृतिक रुपाने संपन्न होऊन पुढे आला. त्यासोबतच येथे बौद्ध धर्मही वाढीस लागला. जेलग बौद्धांनी 14 व्या दलाई लामासही मान्यता दिली.

 

साधारण 40 वर्षांनंतर चीनच्या लोकांनी तिबेटवर आक्रमण केले, त्यावेळी 14 वे दलाई लामा तिबेटचे गुरु होते. या लढाईत तिबेटला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, काही वर्षांनी तिबेटी नागरिकांना चीनविरोधात संघर्ष सुरु केला. तसेच, स्वतंत्र तिबेटची मागणीही करण्यात आली, पण तिबेटला या लढाईत यश मिळाले नाही. त्यावेळी, आपण चीनच्या आक्रमणात आपण अडकल्याची जाणीव दलाई लामा यांना झाली. दरम्यानच्या काळात दलाई लामा यांनी भारताकडे आगेकूच केली. त्यावेळी, 1959 साली दलाई लामा यांच्यासमवेत मोठ्या संख्येने तिबेटी नागरिकही भारतात आले.  

भारताने दलाई लामा यांना शरण दिल्याचे चीनला आवडले नाही, त्यावेळी चीनमध्ये माओत्से संग यांचे सरकार होते. यानंतर चीन व दलाई लामा यांच्यातील तणाव अधिकच वाढत गेला. दलाई लामा यांना जगभरातून सहानुभूती मिळाली, तरी आजही ते निर्वासित म्हणूनच जीवन जगत आहेत. सन 1989 साली दलाई लामा यांना शांतीचा नोबेल देण्यात आला. आता चीनपासून स्वातंत्र्य नको, पण स्वावलंबनाची गरज असल्याचं लामा यांना वाटतं. सन 1950 साली दलाई लामा आणि चीनमध्ये सुरु झालेला वाद आजही कायम आहे. दलाई लामा भारतात राहत असल्यानेच चीनला भारताबद्दल नेहमीच राग आहे.  

टॅग्स :chinaचीनDalai Lamaदलाई लामाBorderसीमारेषाNarendra Modiनरेंद्र मोदी