शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

अफगाणिस्तानात परिस्थिती चिघळली, भारतीयांना आणण्यासाठी मजार-ए-शरीफला जाणार विशेष विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:39 IST

Taliban situation in Afghanistan: भारत सरकारने यूपूर्वीच कांधारमधून आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे, आता मझार-ए-शरीफमधूनही सर्व भारतीयांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्लीः अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परतल्यानंतर परिस्थिती प्रचंड बिघडली आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या 70-80 टक्के भागांवर ताबा मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कांधारमधील भारतीय दूतावास बंद करुन आपल्या सर्व अधिकाऱ्यांना परत बोलावले होते. कांधारनंतर आता मजार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आपल्या सर्व राजदूत, अधिकारी आणि इतर भारतीयांना परत आणण्यासठी एका विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे. हे विमान बुधवारी सर्व भारतीयांना घेऊन परतेल.

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यामुळे तालिबानचे हल्ले वाढले आहेत. अफगाणिस्तानची परिस्थिती बिकट होत चालली असल्यामुळे भारताने आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना कांधारमधून आधीच बाहेर काढले होते. आता मजार-ए-शरीफमधूनही सर्व भारतीयांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी आज संध्याकाळी मजार-ए-शरीफ ते दिल्लीसाठी एक विशेष विमान उड्डाण करणार आहे. मजार-ए-शरीफ येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ही माहिती दिली.

मजार-ए-शरीफमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने ट्विट केले, "एक विशेष विमान मझार-ए-शरीफ येथून नवी दिल्लीकडे रवाना होईल. मजार-ए-शरीफ आणि आसपासच्या परिसरातील कोणत्याही भारतीय नागरिकाला विनंती केली जाते की तो उशिरा सुटणाऱ्या विशेष विमानाने भारतासाठी रवाना होण्यासाठी तयार रहा."

वाणिज्य दूतावासाच्या दुसर्‍या एका ट्विटमध्ये सांगण्यात आले की, भारतात येणाऱ्या विशेष विमानात येण्याची इच्छा असलेल्या भारतीय नागरिकांनी त्यांचे पूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक, व्हॉट्सअॅपद्वारे खालील क्रमांकावर द्यावी: 0785891303, 0785891301 "

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला