शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 09:07 IST

शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय आणि अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय ठरले आहेत.

नवी दिल्ली : ॲक्झिऑम-४ मोहिमेअंतर्गत अवकाशात झेपावलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला व अन्य तीन अंतराळवीर भारतीय वेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी ४ वाजून १ मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. त्यामुळे शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय आणि अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. याआधी, ४१ वर्षांपूर्वी १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी सोवियत युनियनच्या अंतराळयानातून अवकाशात प्रवास केला होता. 

शुभांशू यांना घेऊन जाणारे ड्रॅगन अवकाशयान स्थानकावरील प्रयोगशाळेशी जोडले गेले. या अंतराळयानाला अंतराळवीरांनी ग्रेस असेही नाव ठेवले आहे. फाल्कन-९ रॉकेटच्या साहाय्याने ड्रॅगन यानातून शुभांशू शुक्ला, अमेरिकेच्या पेगी व्हिटसन, हंगेरीच्या टिबोर कापू आणि पोलंडच्या स्लावोश उझ्नान्स्की हे आंतरराष्ट्रीय स्थानकावर पोहोचलेत. 

...अन् आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले

शुभांशू शुक्ला व त्यांचे तीन अंतराळवीर सहकारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दाखल झाले. त्या क्षणाबद्दल शुक्ला यांची आई आशा शुक्ला यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आपल्या सहकाऱ्यांसोबत दाखल झालेल्या शुभांशू यांनी मोठी कामगिरी केली आहे. आता त्यांच्या सुरक्षितरीत्या पृथ्वीवर परत येण्याकडे आमचे डोळे लागले आहेत. आपल्या मुलाच्या कामगिरीमुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. 

पृथ्वीभोवती भ्रमण करत असताना...

अवकाशात झेपावल्यानंतर ड्रॅगनमधून पृथ्वीभोवती भ्रमण करत असताना सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत मी लहान बाळासारख्या अनेक गोष्टी शिकत आहे.

निर्वात वातावरणात तरंगण्याचा अनुभवही विलक्षण आहे, असे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी गुरुवारी अंतराळातून संवाद साधताना सांगितले. ‘ड्रॅगन’ला अंतराळवीरांनी ग्रेस असे नाव ठेवले आहे. 

पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा म्हणाले, पृथ्वी सर्वांची, एकाची नाही 

नवी दिल्ली : अंतराळ प्रवास मानवाच्या विचारसरणीवर प्रभाव टाकतो. त्याची जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलतो. ही पृथ्वी सर्वांची आहे, कोणा एकाची नाही असा विचार त्याच्या मनात रुजतो, असे अंतराळ प्रवास करणारे भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी सांगितले. १९८४ साली रशियाच्या अवकाशयानातून त्यांनी अंतराळ सफर केली होती. त्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ल यांनी अवकाशात झेप घेतली. त्या पार्श्वभूमीवर शर्मा यांनी हे वक्तव्य केले.

दोन महिन्यांत शिकले रशियन भाषा

संरक्षण मंत्रालयाने हवाई दलाचे माजी स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा यांचे विचार एका पॉडकास्टद्वारे प्रसारित केले. त्यांनी सांगितले की, अवकाश सफरीचे प्रशिक्षण व संपूर्ण मोहिमेत सहकाऱ्यांशी फक्त रशियन भाषेत बोलावे लागणार होते. त्यामुळे ही भाषा मी दोन महिन्यांत शिकून घेतली.

अंतराळातून भारत कसा दिसतो?

राकेश शर्मा यांनी म्हटले आहे की, अंतराळातून भारत व पृथ्वी या गोष्टी अलौकिक वाटतात. भारताचे विविध भूभाग, समुद्रकिनारे, घाट, सपाट मैदाने, उष्णकटिबंधीय जंगल, हिमालयाच्या पर्वतरांगा हे सारे विलोभनीय दिसते.  अंतराळात दिवस आणि रात्री खूप विचित्र असतात. तिथे सूर्योदय व सूर्यास्त दर ४५ मिनिटांनी होतात.

टॅग्स :NASAनासाisroइस्रोAmericaअमेरिका