शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
2
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
5
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
6
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
7
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
8
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
9
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
10
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
11
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
12
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
13
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
14
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
15
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
16
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
17
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
18
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
19
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
20
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका

आशियातील ‘ते’ तीन माजी पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 9:19 AM

भारत, पाकिस्तान, जपान हे आशिया खंडातील तीन देश आहेत. आणखी एक दुर्देवी साम्य असे की...

समीर परांजपे, मुख्य उपसंपादक

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे संसदीय निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण करत असताना ८ जुलै रोजी एका हल्लेखोराने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. जगासाठी ही अतिशय धक्कादायक घटना होती. शिंजो आबे हे जपानचे विविध कालखंडात चार वेळा पंतप्रधान झाले होते. भारताविषयी त्यांना जिव्हाळा होता. त्यामुळेच मनमोहन सिंग व आता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत आबे यांचे त्यांच्याशी छान मैत्र जुळले. आबे यांची हत्या करणारा तेत्सुया यामागामी याला शिंजो आबे यांचे राजकीय विचार पटत नव्हते. त्यांची हत्या झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आघाडीच्या बाजूने जपानमध्ये सहानुभूतीची लाट आली आणि त्या आघाडीला मोठा विजय मिळाला. माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा आता आरोप होत आहे. आबे यांच्या हत्येच्या चौकशीत अमेरिकी तपास यंत्रणाही मदत करणार आहेत. त्यांच्या निधनामुळे भारताने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळला होता. भारताने एक सच्चा मित्र गमावला आहे.

राजीव गांधी यांचा दुर्दैवी अंत 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी हत्या झाली. १९९१च्या लोकसभा निवडणुकांत तामिळनाडूतील श्रीपेरुम्बुदुर मतदारसंघामध्ये राजीव गांधी निवडणूक प्रचार करत होते. त्यावेळी एलटीटीईची महिला दहशतवादी तेनमोळी राजरत्नम हिने राजीव गांधी यांच्या पाया पडण्याचा आविर्भाव केला व शरीरावर गुंडाळलेल्या पट्ट्यात दडवलेल्या आरडीएक्सचा स्फोट केला. त्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी, हल्लेखोर व अन्य काही जण ठार झाले. १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर अगदी आकस्मिकपणे राजीव गांधी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आली. श्रीलंकेत भारताने शांतीसेना पाठवल्याने एलटीटीईचा राजीव गांधी यांच्यावर रोष होता. या हत्या प्रकरणी इतर आरोपींना कालांतराने पकडण्यात आले. भारताच्या इतिहासात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.

महिला पंतप्रधानाची अखेर

पाकिस्तानचे दोनदा पंतप्रधानपद भूषविलेल्या बेनझीर भुत्तो यांची रावळपिंडी येथे एका निवडणूक प्रचारयात्रेत २७ डिसेंबर २००७ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या प्रमुख व तत्कालीन विरोधी पक्षनेत्या बेनझीर यांनी पाकिस्तानमध्ये जानेवारी २००८मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ही प्रचारयात्रा काढली होती. रावळपिंडी येथील लियाकत उद्यानामध्ये बेनझीर भुत्तो यांच्यावर गोळीबार तसेच आत्मघाती बॉम्बस्फोटही घडविण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या बेनझीर यांना तातडीने एका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बेनझीर भुत्तो यांचे वडील व पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना पाकिस्तानमध्ये फाशी देण्यात आले होते. बेनझीर भुत्तो यांच्या हत्येनंतर ते आजवर पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय उलथापालथी झाल्या पण तिथे आणखी एखाद्या महिलेला पंतप्रधानपद मिळाले असे घडले नाही. त्यामुळे बेनझीर भुत्तो म्हणजे पाकिस्तानच्या एकमेव महिला पंतप्रधान अशीच नोंद इतिहासामध्ये कायम आहे.

टॅग्स :JapanजपानRajiv Gandhiराजीव गांधीIndiaभारत