शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

पाकिस्तानला 'ही' चूक महागात पडणार; PoK भारतात विलीन करण्याचा मार्ग झाला मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:09 IST

Shimla Agreement Deal: १९७२ च्या शिमला करारानुसार हा भाग पाकिस्तानला देण्यात आला होता.

Pakistan On Shimla Agreement Deal: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानावर जोरदार प्रहार केला. या कारवाईत पाकिस्तानासह पीओकेमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले. ४ दिवस चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाला. पण, यादरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत आणि पाकमधील १९७२ चा शिमला करार पूर्णपणे संपल्याची घोषणा केली होती. 

२२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार थांबवला होता, त्यानंतर पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला. यासोबतच पाकिस्तानी संरक्षण मंत्री म्हणाले होते की, भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती पूर्वीसारखीच झाली आहे. आता नियंत्रण रेषा (एलओसी) युद्धविराम रेषा मानली पाहिजे. तसेच, शिमला करार संपल्याचे घोषित करताना पाकिस्तानी संरक्षण मंत्री म्हणाले की, आता पाकिस्तान भारत-पाकिस्तान वाद द्विपक्षीय ऐवजी बहुपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गाने उपस्थित केला जाईल.

भारताकडे एक उत्तम संधी दरम्यान, शिमला करार संपुष्टात आणण्याच्या घोषणेचा पाकिस्तानवरच सर्वात वाईट परिणाम होऊ शकतो. कारण, १९७१ च्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान पाकिस्तानने काश्मीरमधील चुंब शहर ताब्यात घेतले होते, जे स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होते. १९७२ च्या शिमला करारानुसार या शहरावर पाकिस्तानचे नियंत्रण कायम ठेवण्यात आले.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चुंब महत्वाचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चुंब क्षेत्र खूप महत्वाचे आहे. १९४९ च्या युद्धविराम करारानुसार चुंबदेखील भारताचा एक भाग होता, परंतु १९६५ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानने चुंबवर कब्जा केला. युद्धानंतर चुंब पुन्हा भारताच्या ताब्यात आले, परंतु १९७१ मध्ये पाकिस्तानने पुन्हा चुंबवर कब्जा केला. पुढे १९७२ च्या शिमला करारानुसार हे शहर पाकिस्तानचा भाग झाले. पुढे पाकिस्तानने चुंबचे नाव बदलून इफ्तिकाराबाद केले. पाकिस्तानने शहरावर कब्जा केल्यानंतर चुंबमध्ये राहणारी कुटुंबे भारतात स्थलांतरित झाली.

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा दावाआज चुंब हा पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे, परंतु ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी १९७२ चा शिमला करार संपल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे भारतीय सैन्याकडे चुंब पुन्हा भारतात जोडण्याचा पर्याय आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPOK - pak occupied kashmirपीओकेIndiaभारत