शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

आपसातले मतभेद वादाचं कारण नको, चिनी परराष्ट्र मंत्र्यांची जयशंकर यांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 5:10 PM

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत.

बीजिंगः भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला आहे. देशात अनिश्चिततेचे वातावरण असताना भारत-चीनचे संबंध स्थिर राहणे गरजेचे आहे. जयशंकर यांनी चिनी उपराष्ट्रपती वांग क्विशान यांच्याशी झोंग्ननहाईदरम्यान भेट घेतली आहे.त्यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत एक बैठक घेतली. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू वांग यांच्याशी बातचीत करताना ते म्हणाले, आमचं दोन वर्षांपूर्वीच द्विपक्षीय संबंधांसंदर्भात एकमत झालेलं आहे. देश अनिश्चिततेतून जात असताना आपले संबंध स्थिर राहण्याची गरज आहे.चीनमध्ये पुन्हा आल्यानं मी आनंदात आहे. माझी मागची वर्ष मी आनंदानं स्मरण करतो. मी नशीबवान आहे, मला अनौपचारिक पद्धतीनं शिखर संमेलनाची तयारी करण्याची संधी मिळाली.  जयशंकर यांचं स्वागत करत उपराष्ट्रपती वांग म्हणाले, मला हेसुद्धा माहीत आहे की, चीनमध्ये बऱ्याच काळापासून राहणारे जयशंकर हे भारतीय राजदूत आहेत. दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. जयशंकर यांचा हा दौरा भारत आणि चीनसाठी फायदेशीर ठरणार असल्याचंही वांग म्हणाले. जयशंकर यांच्या या दौऱ्यात चार द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी केली जाणार आहे.