शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

"भारतानं पुतिन यांना दिलाय 'फोर पॉइंट फॉर्म्युला", आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 17:06 IST

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी भारत आणि चीन हे दोन देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे व्लादिमीर पुतीन यांनी नुकतेच म्हटले होते. यानंतर लगेचच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मॉस्को दौऱ्यावर गेले. खरे तर या युद्धात भारताच्या भूमिकेडके संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यातच आता, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

युद्धासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना एस जयशंकर म्हणाले, "भारत चार तत्त्वांवर विश्वास ठेवतो. एक म्हणजे, हा शांततेचा काळ असायला हवा, दुसरे म्हणजे, रणांगणावर कुठल्याही प्रकारची समस्या सुटू शकत नाही, तिसरे म्हणजे, कुठल्याही प्रकारच्या यशस्वी शांतता प्रक्रियेसाठी रशियाने चर्चेच्या टेबलावर असायला हवे आणि चौथे म्हणजे, भारत ह संघर्ष सोडवण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असून चिंतित आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉस्को आणि कीव दौऱ्यांसंदर्भात बोलताना जयशंकर यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सध्याच्या रशिया दौऱ्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “युद्धाच्या माध्यमाने वाद सोडविले जाऊ शकतात, यावर आमचा विश्वास नाही. आम्हाला वाटते की, जेव्हा चर्चा होईल, तेव्हा त्यात रशियानेही भाग घ्यायला हवा. राहिला प्रश्न भारताचा, तर हे रशिया आणि युक्रेनच्या इच्छेवर अवलंबून आहे, आम्ही त्यांच्यासोबत सातत्याने बोलत आहोत.”

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतAjit Dovalअजित डोवाल