शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"भारतानं पुतिन यांना दिलाय 'फोर पॉइंट फॉर्म्युला", आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 17:06 IST

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी भारत आणि चीन हे दोन देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे व्लादिमीर पुतीन यांनी नुकतेच म्हटले होते. यानंतर लगेचच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मॉस्को दौऱ्यावर गेले. खरे तर या युद्धात भारताच्या भूमिकेडके संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यातच आता, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

युद्धासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना एस जयशंकर म्हणाले, "भारत चार तत्त्वांवर विश्वास ठेवतो. एक म्हणजे, हा शांततेचा काळ असायला हवा, दुसरे म्हणजे, रणांगणावर कुठल्याही प्रकारची समस्या सुटू शकत नाही, तिसरे म्हणजे, कुठल्याही प्रकारच्या यशस्वी शांतता प्रक्रियेसाठी रशियाने चर्चेच्या टेबलावर असायला हवे आणि चौथे म्हणजे, भारत ह संघर्ष सोडवण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असून चिंतित आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉस्को आणि कीव दौऱ्यांसंदर्भात बोलताना जयशंकर यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सध्याच्या रशिया दौऱ्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “युद्धाच्या माध्यमाने वाद सोडविले जाऊ शकतात, यावर आमचा विश्वास नाही. आम्हाला वाटते की, जेव्हा चर्चा होईल, तेव्हा त्यात रशियानेही भाग घ्यायला हवा. राहिला प्रश्न भारताचा, तर हे रशिया आणि युक्रेनच्या इच्छेवर अवलंबून आहे, आम्ही त्यांच्यासोबत सातत्याने बोलत आहोत.”

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतAjit Dovalअजित डोवाल