शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

रोहिंग्यांची नायिका, वंगबंधूकन्येला शांततेचे नोबेल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:33 IST

शेख हसिना वाजेद यांनी बांगलादेशात 5 लाखांहून अधिक स्थलांतरितांना 25 ऑगस्टपासून आश्रय दिला आहे. त्याआधीही लाखो रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्देरोहिंग्या आणि अल्पसंख्यांकाविरोधात म्यानमारमधील राखिन प्रांतामध्ये तणाव निर्माण झालेला असताना लाखो आश्रितांना मदत देण्यासाठी पुढे आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांन शांततेचे नोबेल देण्याची मागणी केली जात आहे. शेख हसिना आणि आंग सान सू की यांच्यामध्ये काही साम्यस्थळेही आहेत. शेख हसिना यांचे वडिल वंगबंधू मुजिबूर रेहमान हे बांगलादेशाचे संस्थापक मानले जातात तर आंग सान सू की यांचे वडील आंग सान ही म्यानमारच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले व म्यानमारचे राष्ट्रपिता मानले जा

न्यू यॉर्क, दि.4- रोहिंग्या आणि अल्पसंख्यांकाविरोधात म्यानमारमधील राखिन प्रांतामध्ये तणाव निर्माण झालेला असताना लाखो आश्रितांना मदत देण्यासाठी पुढे आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांन शांततेचे नोबेल देण्याची मागणी केली जात आहे. अमेरिका तसेच युरोपातील अनेक वृत्तपत्रे आणि नेत्यांनी या खऱ्या नायिकेला नोबेल देऊन सन्मान केला पाहिजे अशी भावना गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा व्यक्त केली आहे. शेख हसिना वाजेद यांनी बांगलादेशात 5 लाखांहून अधिक स्थलांतरितांना 25 ऑगस्टपासून आश्रय दिला आहे. त्याआधीही लाखो रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे.

(म्यानमारमधून जीव मुठीत धरुन पळालेल्या रोहिंग्यांना बांगलादेशात आश्रय घ्यावा लागला)

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस म्यानमारमधील तणावग्रस्त राखिन प्रांतामध्ये जाळपोळ, बलात्कार आणि हत्येचे सत्र सुरु झाले. रोहिंग्यांना राखिन प्रांतामधून हाकलण्यासाठी पद्धतशीर प्रयत्नही केले जात आहेत. या दंगलींना घाबरुन रोहिंग्यांनी नेफ नदी ओलांडून बांगलादेशात प्रवेश केला. लाखो लोकांनी नो मॅन्स लॅंडमध्येही आश्रय घेतला आहे. आधीच गरिबीने आणि लोकसंख्येचा भार वागवणाऱ्या बांगलादेशाने या रोहिंग्यांना आश्रय दिला. संयुक्त राष्ट्राच्या मदतीने अन्न, औषधे, तात्पुरता निवारा, स्वच्छता या सोयीही रोहिंग्यांना पुरविण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेमध्ये शेख हसिना वाजेद यांनी मोठा वाटा उचलला होता.

शेख हसिना गेल्या महिन्यामध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी अमेरिकेत गेल्या तेव्हा त्यांची काही क्षणांसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्याशी भेट झाली. ट्रम्प यांच्याकडे तुम्ही मदतीचा हात का मागितला नाहीत असे त्यांना पत्रकारांनी विचारताच त्या म्हणाल्या होत्या,' मी का त्यांच्याकडे मदत मागावी, त्यांची स्थलांतरीतांबाबतची भूमिका आम्हा सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्यांच्याकडे मदत मागण्याची कल्पनाही मी केली नाही' शेख हसिना यांच्या या भूमिकेबद्दल त्यांचे प्रसारमाध्यमांनी कौतुक केले होते. ज्या म्यानमारमध्ये जाळपोळ आणि हत्येचे सत्र सुरु आहे त्या देशामध्ये लोकशाहीसाठी लढणाऱ्या आंग सान सू की या स्टेट कौन्सीलर या खऱ्याखुऱ्या सर्वोच्च अधिकारपदावर आहेत. अल्पसंख्यांकावर होणारे अत्याचार त्या थांबवतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती, मात्र दुर्दैवाने अशी कोणतीही ठाम भूमिका घेतली नाही. इतकेच नव्हे तर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला त्यांनी म्यानमारची बाजू मांडणेही पसंत केले नाही. आंग सान सू की यांनी रोहिंग्यांसाठी कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्याचे सांगत त्यांचा 'फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ द ऑक्सफर्ड' हा सन्मान मागे घेण्यात आला आहे. तर शेख हसिना यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत केलेल्या भाषणात म्यानमारने रोहिंग्यांना अभय देऊन पुन्हा राखिन प्रांतात परत घ्यावे अशी मागणी केली. म्यानमारने रोहिंग्याच्या परतीच्या मार्गामध्ये भूसुरुंग पेरल्याबद्दल त्यांनी निषेधही केला. शेख हसिना यांनी या भाषणाच्यावेळेस 1971 साली बांगलादेश म्हणजे तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील लोकांच्या, विचारवंतांच्या, लेखकांच्या हत्या केल्याबद्दल पाकिस्तानच्या लष्कराचाही तीव्र भाषेत उल्लेख केला. वाजेद यांच्या या भाषणाचेही सर्वत्र कौतुक झाले होते.

रोहिंग्या का पळून जात आहेत ते माहिती नाही - अाँग सान सू की

रखाइनमधील हिंसाचाराबाबत म्यानमारची चिंता योग्यच , मोदी यांचे निवेदन : आँग सान सू की यांनी मानले आभार

शेख हसिना आणि आंग सान सू की यांच्यामध्ये काही साम्यस्थळेही आहेत. शेख हसिना यांचे वडिल वंगबंधू मुजिबूर रेहमान हे बांगलादेशाचे संस्थापक मानले जातात तर आंग सान सू की यांचे वडील आंग सान ही म्यानमारच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले व म्यानमारचे राष्ट्रपिता मानले जातात. मुजिबूर रेहमान आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारल्यानंतर शेख हसिना यांनी भारतात आश्रय घेतला होता. तर आंग सान सू की यांनीही नवी दिल्लीमध्ये शिक्षण घेतले आहे. 

रोहिंग्यांवर टीकाही होते...

शेख हसिना वाजेद यांनी रोहिंग्यांना आश्रय दिल्यामुळे त्यांचे कौतुक होत असले तरी रोहिंग्यांनीही म्यानमारमध्ये अशांतता माजवली असा आरोप म्यानमारमधील नेते वारंवार करत आले आहेत. तसेच रोहिंग्या हे नेहमीच म्यानमारविरोधी कृत्ये करतात असे तेथील राजकीय, लष्करी व धार्मिक नेत्यांचे म्हणणे आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या तणावाच्या सत्राची सुरुवात रोहिंग्यांनीच केली असे म्यानमार लष्कराचे म्हणणे आहे.