शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

रोहिंग्यांनी पाळला काळा दिवस; म्यानमारमधील हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 2:34 PM

रोहिंग्यांनी प्रार्थना, भाषणे आणि गाण्यांचे आयोजन करुन काळा दिवस पाळला आहे.

ढाका- म्यानमारमधील रखाइन प्रांतामध्ये झालेल्या हिंसाचाराला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. रोहिंग्यांनी या दिवसाला काळा दिवस जाहीर करुन गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. सुमारे 7 लाख रोहिंग्यांना आपले घरदार सोडून बांगलादेशातील निवारा शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे.रोहिंग्या दहशतवाद्यांनी रखाईनमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केल्यावर म्यानमानच्या लष्कराने रोहिंग्यांविरोधात मोहीमच उघडली. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले तर कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले.रोहिंग्यांनी प्रार्थना, भाषणे आणि गाण्यांचे आयोजन करुन काळा दिवस पाळला आहे. रोहिंग्यांच्या इतक्या मोठ्या संख्येमुळे बांगलादेशातील कॉक्स बझारमधील छावणीतील व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. बांगलादेशातील या रोहिंग्यांच्या स्थितीबद्दल ह्युमन राइटस वॉच संस्थेने 68 पानांचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. पावसाळ्यामध्ये पूर तसेच दरड कोसळण्याचा या रोहिंग्यांना मोठा धोका आहे तसेच संसर्गजन्य रोग, आग, सामूहिक तणाव, घरगुती व लैंगिक छळ अशी संकटे येथे उभी असल्याची माहिती ह्युमन राइटस वॉचने दिली आहेत. रोहिंग्याला भक्कम आश्रयस्थान, शिक्षणाची सोय दिली पाहिजे असेही या अहवालात म्हटले आहे. बांगलादेश इज नॉट माय कंट्री- द प्लाइट ऑफ रेफ्युजीस फ्रॉम म्यानमार असे या अहवालाचे नाव आहे. या लोकांना उखिया येथील मोठ्या छावणीत पाठवावे अशी सूचना त्यात करण्यात आली आहे.गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून 7 लाख रोहिंग्यांनी म्यानमारच्या रखाईन प्रांतातून स्थलातंर केले आहे आणि त्यांनी बांगलदेशात प्रवेश केला आहे.  कुतापलाँग-बालुखाली या छावणीमध्ये 6 लाख 26 हजार लोक राहात असून जगातील सर्वात मोठी छावणी म्हणून ती ओळखली जात आहे. येथे अत्यंत कमी जागेत जास्त लोक सामावले असून प्रत्येक व्यक्तीला 10.7 चौ. मी इतकी जागा राहाण्यासाठी मिळत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी किमा 45 चौ. मी जागा उपलब्ध असली पाहिजे. यातील 2 लाख रोहिंग्यांना पूर आणि दरडींचा त्रास सहन करावा लागू शकतो.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याBangladeshबांगलादेशMyanmarम्यानमार