शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

कोरोना विषाणूचा धोका वाढला, जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 08:39 IST

परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी कोरोना विषाणूला आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केले आहे.

जिनेव्हा - वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणुमुळे चीनमध्ये आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या आजाराचे गांभीर्य विचारात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी कोरोना विषाणूला आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केले आहे. कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी योग्य तो समन्वय साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. ज्या देशांमधील आरोग्य यंत्रणा कमकुवत आहे, अशा देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होण्यापासून रोखणे ही चिंतेची बाब आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अॅडनम यांनी सांगितले. याबाबत टेड्रोस यांनी सांगितले की, आम्ही सर्वांनी एकत्र मिळून कोरोना विषाणूचा फैलाव रोखला पाहिजे. केवळ आम्ही सर्वजण एकत्र येऊन या संकटाचा सामना करू  शकतो.'' टेड्रोस यांनी गेल्या आठवड्यात चीनचा दौरा केला होता. तसेच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली होती.

कोरोना विषाणूचा धोका वाढल्यानंतर प्रवास आणि व्यापारावर निर्बंध घालण्यासारखे उपाय योजण्यात आले आहेत. मात्र अशा उपायांची गरज नाही, असेही टेड्रोस यांनी सांगितले. दरम्यान,  कोरोना विषाणूचा धोका उत्पन्न झाल्यानंतर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना वुहानला न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच वुहानमधून येणाऱ्या लोकांवरही बंदी घातली आहे. तर रशियाने चीनकडील आपली पूर्व सीमा बंद केली आहे.  

‘कोरोना’ आरोग्य यंत्रणेला अलर्ट

कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये अडकले महाराष्ट्रातील 7 विद्यार्थी

कोरोना साथ : दक्षता हवी, भय नकोदरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आल्याने देशात घबराट पसरली आहे. वुहान विद्यापीठामध्ये शिकणारा विद्यार्थी केरळमध्ये परतल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मुंबईत दाखल केलेल्या सहापैकी तिघांना कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

दिल्लीत ज्या तिघांना डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र मुंबईच्या दहिसरमधील एका तरुणाला गुरुवारी कोरोनाच्या संशयामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो अन्य देशांतून शांघायमार्गे भारतात आला आहे, असे सांगण्यात आले. मुंबईसह देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशांतून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनIndiaभारतWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना