शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मुंबईकरांना दिलासा; तलाव क्षेत्रात पावसाने खाते उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 06:10 IST

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम ४.९ टक्के जलसाठा उरल्यामुळे मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम ४.९ टक्के जलसाठा उरल्यामुळे मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. संकटकाळासाठी राखून ठेवलेल्या जलसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यास महापालिका प्रशासनाने आता सुरुवात केली आहे. अशा चिंताजनक स्थितीत पावसाने शुक्रवारी सुखद दिलासा दिला. गुरुवारी रात्रीपासून पावसाने सुरुवात केली आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाºया सात तलावांमध्ये एकूण ७१ हजार दशलक्ष लीटर जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र तलावांमध्ये सतत जलसाठा कमी होत असल्याने पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वांचेच लक्ष पावसाकडे लागले होते. गुरुवारी संध्याकाळी पावसाची संततधार सुरू राहिली. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील तलाव क्षेत्रांतही शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत असलेल्या विहार आणि तुलसी तलावांत जोरदार पाऊस पडला. तर, मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा तलाव क्षेत्रांमध्येही पाऊस बरसत होता.

मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांत १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा अपेक्षित आहे. मात्र गेल्या वर्षी नऊ टक्के कमी साठा तलावांमध्ये जमा झाला. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून मुंबईत सरसकट १० टक्के पाणीकपात लागू आहे. मात्र मान्सून तब्बल तीन आठवडे लांबल्याने तलावांतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली. शासनाच्या भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांतून राखीव साठा मुंबईला देण्याची मागणी मान्य झाल्यामुळे मुंबईकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरण