शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

मुंबईकरांना दिलासा; तलाव क्षेत्रात पावसाने खाते उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 06:10 IST

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम ४.९ टक्के जलसाठा उरल्यामुळे मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम ४.९ टक्के जलसाठा उरल्यामुळे मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. संकटकाळासाठी राखून ठेवलेल्या जलसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यास महापालिका प्रशासनाने आता सुरुवात केली आहे. अशा चिंताजनक स्थितीत पावसाने शुक्रवारी सुखद दिलासा दिला. गुरुवारी रात्रीपासून पावसाने सुरुवात केली आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाºया सात तलावांमध्ये एकूण ७१ हजार दशलक्ष लीटर जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र तलावांमध्ये सतत जलसाठा कमी होत असल्याने पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वांचेच लक्ष पावसाकडे लागले होते. गुरुवारी संध्याकाळी पावसाची संततधार सुरू राहिली. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील तलाव क्षेत्रांतही शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत असलेल्या विहार आणि तुलसी तलावांत जोरदार पाऊस पडला. तर, मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा तलाव क्षेत्रांमध्येही पाऊस बरसत होता.

मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांत १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा अपेक्षित आहे. मात्र गेल्या वर्षी नऊ टक्के कमी साठा तलावांमध्ये जमा झाला. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून मुंबईत सरसकट १० टक्के पाणीकपात लागू आहे. मात्र मान्सून तब्बल तीन आठवडे लांबल्याने तलावांतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली. शासनाच्या भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांतून राखीव साठा मुंबईला देण्याची मागणी मान्य झाल्यामुळे मुंबईकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरण